27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeChiplunइतक्या खालच्या पातळीवर मी लक्ष देत नाही - पालकमंत्री उदय सामंत

इतक्या खालच्या पातळीवर मी लक्ष देत नाही – पालकमंत्री उदय सामंत

शहरातील बहादूरशेखनाका येथे स्वामी मंगल कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद झाली.

आमदार भास्कर जाधव यांचे काय सांगू? ते बारामतीमधून देखील निवडणूक लढवतील. मी राज्याचा नेता आहे. इतक्या खालच्या पातळीवर मी लक्ष देत नाही. भाषण काय मीही करतो, त्यामुळे बोलायला काय जाते? प्रत्यक्षात जनता ठरवते, कोणाला विजयी करायचे ते. लोकशाहीत ज्यांच्या नशिबात असते तोच विजयी होतो, अशा शब्दात पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या भाषणाचा समाचार घेतला. शहरातील बहादूरशेखनाका येथे स्वामी मंगल कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद झाली. या वेळी शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते. या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पालकमंत्री सामंत म्हणाले, ‘आता अजित पवार राष्ट्रवादी गट सत्तेत सहभागी झाला आहे.

आमच्याबरोबर भाजप, राष्ट्रवादी गट, आरपीआय आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्यादृष्टीने जागा वाटपाबाबत आमचे तीन नेते एकत्र बसतील व निर्णय घेतील. तो सर्वांना मान्य असेल. आमच्या नेत्यांना महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीची माहिती आहे. त्या त्या ठिकाणची ताकद आणि स्थिती याची नेत्यांना पूर्ण कल्पना आहे.’ आमदार जाधव यांच्या वक्तव्यांवर ते म्हणाले, ‘ते कुठून निवडणूक लढवतील हे तेच ठरवतील. आपल्याला त्यात स्वारस्य नाही. मी राज्याचा नेता आहे. इतक्या खालच्या पातळीवर मी लक्ष देत नाही. आमदार जाधवांनी बारामती, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी कोठूनही निवडणूक लढवावी, त्यांचा तो अधिकार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular