29.4 C
Ratnagiri
Wednesday, May 21, 2025

चिपळूणची शासकीय कार्यालये कोकणात सरस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वच शासकीय...

कोयनेचे अवजल मुंबईकडे वळवण्याच्या हालचालींना वेग

कोयना धरणातील वीजनिर्मितीनंतर शहरातील वाशिष्ठी नदीमार्गे अरबी...

‘समर’ स्पेशल विक्रमी गर्दीने धावत असल्याने कोकण मार्गावर चाकरमान्यांची लटकंती सुरुच

उन्हाळी सुट्टी हंगामासह लग्नसराई अन् ग्रामदेवतांच्या उत्सवांमुळे...
HomeRatnagiriरत्नागिरीतील प्रशालेचा अद्भुत निर्णय

रत्नागिरीतील प्रशालेचा अद्भुत निर्णय

चिपळूण मधील इंडियन सायंटिफिक एज्युकेशन सोसायटीचे एसीबी इंटरनशनल स्कूल आणि एसबी प्ले स्कूलच्या वतीने घेतल्या गेलेल्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले गेले आहे. कोविड -१९ च्या महामारीमध्ये दोन्ही पालक गमावलेल्या मुलांसाठी या शाळेच्या संस्थेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरीमधील कापसाळ चिपळूण येथील एसीबी इंटरनशनल स्कूलने कोरोनाच्या विळख्यात सापडून दोन्ही पालकाना गमावलेल्या अनाथ मुलांना मोफत शिक्षण तसेच मुलांच्या संर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम घेण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला आहे. कोरोना काळामध्ये पालकत्व गमावून अनाथ झालेल्या मुलांची जबाबदारी जरी शासनाने घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारचा समाजशील निर्णय घेणारी रत्नागिरी जिल्ह्यातील एसीबी इंटरनशनल स्कूल ही एकमेव शाळा ठरली आहे.

या बाबत माहिती देताना चेअरमन अमोल भोजने म्हणाले कि, प्रशालेमध्ये नर्सरी पासून सातवी पर्यंतचे वर्ग असून, प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक रित्या लक्ष पुरविले जाते. कोरोना काळात पालक गमावल्यामुळे अनाथ झालेल्या मुलांना दिल्ली बोर्डाचे सीबीएसई पॅटर्नचे शिक्षण या मुलांना देण्यात येणार आहे. भविष्यामध्ये शिक्षणामुळे या मुलांची कोणत्याही प्रकारे कुचंबणा होता कामा नये, चांगले शिक्षण असले कि, भविष्य सुद्धा सुरक्षित होण्यासाठी त्या मुलांना मदतच होईल. त्यामुळे सोमवारी झालेल्या संस्थेच्या बैठकीमध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे.

मोफत शिक्षणासोबत ज्या ज्या सुविधा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहेत, त्या पुरविण्याकडे आमचा कल राहील असे संस्थेचे चेअरमन भोजने यांनी सांगितले. प्रशालेने घेतलेल्या या अद्भुत निर्णयाबाबत सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular