कोकणतील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदळवने आहेत. या कांदळवन क्षेत्रात पर्यटन विकास करण्याकरीता पर्यटकांना सोयीसुविधा पुरविण्याचे नियोजन आहे. वनविभागाच्या माध्यमातून वनीकरण सुरूच आहे. यासोबतच जन सहभागातून वनीकरण वाढविणार असून वनराजीचे जतन, संवर्धन आणि संगोपन करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रामध्ये वन विभागातर्फे एक दिवसीय वनोपज आधारित उद्योग निर्मिती उपक्रमांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपत झाले. याप्रसंगी वनविभागाचे अपर मुख्य सचिव मिलींद मौसकर, वनबल प्रमुख प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिश्वास, वन्यजीव प्रधान मुख्य बनसंरक्षक एस. श्रीनिवास राय, सामाजिक वनीकरणा प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खडिकर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे, माजी सभागृह नेते रवींद्र इथापे, माजी स्थायी समिती सभापती अनंत सुतार, नेत्रा शिर्के, संकल्प नाईक, फॉरस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडगे व्यवस्थापकीय संचालक नरेश शुरमुरे, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ व्यवस्थापकीय संचालक पी. कल्याणकुमार, कांदळवन कक्ष अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव आदी उपस्थित होते.
वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेट देऊन पाहणी केली. प्रदर्शनात वनौषधी, हस्तकला, शेतीपूरक उत्पादने, तसेच वनसंवर्धन आणि रोजगार निर्मितीशी संबंधित माहिती देण्यात आली. प्रदर्शनामध्ये बनोपज उत्पादने, महाराष्ट्रातील ‘कांदळवनांची माहिती, व्याघ्र प्रकल्प, कांदळवन संवर्धन, प्रस्तावित कांदळवन इत्यादींची माहिती देणारे स्टॉल मांडण्यात आले होते.