27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeSindhudurgविनायक राऊतांचे डिपॉझिट "जप्त करणार : नारायण राणे

विनायक राऊतांचे डिपॉझिट “जप्त करणार : नारायण राणे

रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी येणारा काळ उज्वल असेल असे मत राणेंनी व्यक्त केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचे डिपॉझिट जप्त करून मी प्रचंड मतांनी निवडून येणार असा दावा महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांनी केला. सावंतवाडी येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्या सोबत ना. दिपक केसरकर, राजन तेली व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीचे उमेदवार नाखयण राणे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी राणे यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले की, रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी येणारा काळ उज्वल असेल असे मत राणेंनी व्यक्त केले.

तर विनायक राऊत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे निवडून आले. त्यांना याचा विसर पडला आहे. राऊत यांनी आपले किती दिवस शिल्लक आहेत ते मोजावेत. त्यांचे शेवटचे दिवस शिल्लक राहीलेत असा घणाघात मंत्री दीपक केसरकर यांनी विनायक राऊत यांनी केलेल्या टीकेवर पलटवार करताना केला. ते म्हणाले, दिल्लीच्या मंत्रीमंडळात नारायण राणेंनी. नेतृत्व केलं आहे. पुन्हा एकदा त्यांनी शपथ घ्यावी अशी जनतेची इच्छा आहे. भरघोस मतांनी त्यांना निवडून देत मोदींच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा पाठवणार आहे. येथील रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प दोडामार्ग तालुक्यात येत आहे. सिंधुदुर्गतील लोकांना रोजगारासाठी गोव्याला जाव लागू नये यासाठी पुढाकार घेतला आहे. २०० कोटींचा प्रकल्प इथे होत आहे.

उद्धव ठाकरे, विनायक राऊत दहा वर्षांत काहीही करू शकले नाहीत. नारायण राणे यांनी या जिल्ह्याच्या कोकणच्या विकासासाठी मोठ योगदान दिलं आहे. विनायक राऊत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे निवडून आले. ते अपघातानं खासदार झाले आहेत. आता त्यांनी आपले किती दिवस शिल्लक आहेत ते मोजावेत. त्यांचे शेवटचे दिवस शिल्लक राहीलेत असा घणाघात दीपक केसरकर यांनी केला. याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, राष्ट्रवादीचे सुरेश गवस, युवराज लखम राजे भोंसले आदी उपस्थित होते..

RELATED ARTICLES

Most Popular