27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeChiplunचिपळुणात बांगलादेशी पकडले सलग २ दिवसात केली ४ जणांवर कारवाई

चिपळुणात बांगलादेशी पकडले सलग २ दिवसात केली ४ जणांवर कारवाई

बांगलादेशहन भारतात अवैधरित्या प्रवेश करून मुलखी अधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय वास्तव्य करत होते.

चिपळुणात आणखी दोन बांगलादेशी पकडले सलग २ दिवसात केली ४ जणांवर कारवाई दिवसांत चार जणांवर कारवाई करण्यात आंली. या बांगलादेशींना काही बांधकाम व्यावसायिकांनी आश्रय दिल्याचे समोर आले आहे. महंमद हसन अली (३६) व असाद कामरु जवान सिरीना (२४, दोघेही सध्या रा. मार्कडी परकार चाळीसमोर, मूळ रा. पो. कुशखली, तहसील सातखिरा, जि. खुलना, ठाणा, सातसिरा, राज्य ढाका, बांगलादेश) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद दहशतवाद बांगलादेशींना बांधकाम क्षेत्राचा आश्रय? नव्याने अटक केलेले दोघेजण भारतात अवैधरित्या प्रवेश करून मार्कडी, परकार चाळसमोरील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत राहत होते.

हे दोघेही १२ डिसेंबर २०२३ ते १७ एप्रिल २०२४ रोजी या कालावधीत अवैधरित्या याठिकाणी वास्तव्य करत असल्याचे स्पष्ट झालें आहे. यापूर्वीही काही जण बांधकाम क्षेत्रात काम करत असल्याचे व तेथेच एखादी खोली भाड्याने घेऊन राहत असल्याचे उघड झाले आहे. विरोधी शाखेचे पोलिस हेड कॉन्स्टेबल महेश दगडू गुरव यांनी दिली आहे. या दोघांविरुद्ध भारतात प्रवेश नियम १९५० चा नियम ३ सह ६, परकीय नागरिक आदेश १९४८ परिः ३(१) (अ), परकीय नागरिक कायदा १९४६ चे कलम १४ अन्वये कारवाई केली आहे. यापूर्वीही चिपळुणातून आठ ते दहा बांगलादेशींना पोलिसांनी अटक केली आहे.

बांगलादेशहन भारतात अवैधरित्या प्रवेश करून मुलखी अधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय वास्तव्य करत होते. मूळचे बांगलादेशी असलेल्या या व्यक्तींकडे भारतीय नागरिकांप्रमाणे आधारकार्ड, निवडणूक मतदार असलेले ओळखपत्र, पॅनकार्ड अशी कागदपत्रे आढळली आहेत. त्यामुळे नागरीकत्व नसतानाही कागदपत्रे कोणत्या आधारे त्यांनी मिळवली, तसेच या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी कोण कोणते व्यवहार केले, असे अनेक प्रश्न याआधी उपस्थित करण्यात आले. परंतु, त्याचा तपास थंडावला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular