27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiriलांज्यात काजळी नदीत सख्ख्या भावांचा बुडून मृत्यु

लांज्यात काजळी नदीत सख्ख्या भावांचा बुडून मृत्यु

दोघे भाऊ मुळे शोधण्यासाठी काजळी नदीपात्रातील खोल डोहाच्या ठिकाणी उतरले.

नदीतील मुळे शोधण्यासाठी गेलेल्या दोघा सख्या भावांचा नदीपात्रातील डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास आंजणारी येथील काजळी नदीत घडली आहे. दोघाही तरुणांचे मृतदेह हाती लागले आहेत. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आंजणारी – नांदिवली गावच्या सीमेवर राहणारे प्रमोद नारायण शिंदे (२५ वर्षे) आणि मनीष नारायण शिंदे (२२ वर्षे) हे. शनिवारी दुपारी ३.४५ वाजता काजळी नदीवर मुळे शोधण्यासाठी गेले होते.

यावेळी त्यांच्यासोबत त्याचे मामा पांडुरंग धोंडू शिंदे आणि बहीण कल्याणी दिनेश पडियार हे देखील होते. प्रमोद शिंदे आणि मनीष शिंदे हे दोघे भाऊ मुळे शोधण्यासाठी काजळी नदीपात्रातील खोल डोहाच्या ठिकाणी उतरले. मात्र खोल डोहातं गेल्यानंतर यातील मनीष शिंदे हा डोहात बुडाला. तर लहान भाऊ मनीष हा डोहात बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रमोद हा त्याला वाचविण्यासाठी त्या ठिकाणी गेला. मात्र दुर्दैवाने तो देखील डोहात बुडाला. आपले दोन्ही भाचे नदी पात्रात दिसत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मामा पांडुरंग शिंदे यांनी आरडाओरडा केला.

मात्र दुर्दैवाने फार उशीर झाला होता. दोन्ही भाऊ नदीतील खोल डोहात बुडाले होते. ही घटना आंजणारी आणि वेरळ गावच्या सीमेवर असणाऱ्या वेरळ स्मशानभूमी नजीक काजळी नदीत घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अनेक ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतली. लांजा पोलीसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर डोहात बुडालेल्या दोघा भावांचा शोध घेण्यासाठी वेरळ येथील वसंत गजबार आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी नदीपात्रात उतरले.

डोहात शोधाशोध केल्यानंतर दोन्ही भाऊ डोहातील चिखलात रुतलेला अवस्थेत आढळून आले. दोन्ही भावांचे मृतदेह डोहातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, या घटनेची लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. दोन सख्ख्या भावांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याने आंजनारी व नांदिवली गावातून हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular