25 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriसंगमेश्वर स्थानकावर ९ गाड्यांना थांबा मिळविण्यासाठी १५ ऑगस्टला उपोषण

संगमेश्वर स्थानकावर ९ गाड्यांना थांबा मिळविण्यासाठी १५ ऑगस्टला उपोषण

या स्थानकात दररोज सुमारे १६०० प्रवासी ये जा करतात. 

संगमेश्वर स्थानकात लांब पल्लूयाच्या ९ गाडयांना थांबा मिळावा अशी मागणी गेले अनेक महिने होत आहे. या मागणीकडे कोकण रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याने येत्या स्वातंत्र्यदिनी संगमेश्वर स्थानकात लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर या फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी दिली आहे. संगमेश्वर हा तालुका भौगोलिक दृष्टीने जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून सुमारे १९६ गावे असलेल्या या तालुक्यातील जनतेसाठी संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक हे कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. वर्षाला सर्वाधिक सुमारे ५ कोटी ३७ लाख हुन उत्पन्न देणाऱ्या या स्थानकात दररोज सुमारे १६.०० प्रवासी ये जा करतात.

या प्रवाशांना खरं तर सध्यस्थितीत असणाऱ्या गाड्या खूपच कमी पडत आहेत याचाच विचार करून निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर यां फेसबुक ग्रुप ने संघर्ष करून गतवर्षी नेत्रावती एक्सप्रेसला थांबा मिळवला. गुजरात, दिल्ली, तामिळनाडूकडे जाणाऱ्या गाड्यांपैकी एक तरी गाडी या स्थानकात थांबणे अपेक्षित आहे. मात्र अपेक्षित उत्पन्न देत असतानाही कोकण रेल्वे प्रशासन इथल्या प्रवाशांच्या मागण्याना योग्य प्रतिसाद देत नाही असा आरोप प्रवासी करत आहेत. या स्थानकावर ९ गाडयांना थांबा मिळावा अशी मागणी सातत्याने करण्यात आली आहे. मात्र त्याकडे दूर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाविरूद्ध १५ ऑगस्टला १ दिवसाचे लाक्षणिक उपोषण आपण करणार असल्याचे संदेश जिमन यांनी जाहीर केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular