27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeMaharashtraदहावी आणि बारावी परीक्षांच्या निकाल ह्या तारखेला...

दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकाल ह्या तारखेला…

१० जूनपर्यंत दहावी तर २० जूनपर्यंत बारावीचे निकाल जाहीर होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. १० जूनपर्यंत दहावी तर २० जूनपर्यंत बारावीचे निकाल जाहीर होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन निकाल पाहणे देखील शक्य होणार आहे.

परीक्षेच्या शेवटच्या पेपरनंतर ६० दिवसांच्या कालावधीत निकाल जाहीर केला जातो. पण यंदा बारावीचा १५  दिवस उशिरा सुरु झाला. त्यामुळे बारावीचा निकाल उशिरा म्हणजे १० जूनपर्यंत जाहीर केला जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले आहे.

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. बारावीच्या परीक्षेला यंदा १४.७२ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. तर १६.२५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. महाराष्ट्र एसएससी आणि एचएससीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी त्यांचा स्कोअर अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जाऊन तपासून आणि डाऊनलोड करु शकतील.

पेपर तपासण्याचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ३० टक्यांमध्ये बार कोड स्कॅनिंगचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे आता बारावी आणि दहावी परीक्षांच्या निकालांसाठी १० आणि २० जून या तारखा निश्चित केल्या आहेत. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular