26.2 C
Ratnagiri
Thursday, October 24, 2024

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई- गोवा बनावटीच्या मद्यासह कोटीचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी, दि. २३ (जिमाका)- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर...

या खेळाडूच्या टीम इंडियात पुनरागमनाचे भवितव्य काय…

भारत विरुद्ध न्यूझीलंड पुणे कसोटी आता जवळ...
HomeRatnagiriशाळांच्या परिसरात सीसीटीव्ही बसवा, पोलिस अधीक्षक कुलकर्णी

शाळांच्या परिसरात सीसीटीव्ही बसवा, पोलिस अधीक्षक कुलकर्णी

सर्व शाळांनी आपल्या शाळेमध्ये परिवहन समितीची स्थापना करावी.

सर्व शाळांच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, तसेच शाळांमध्ये परिवहन समितीची स्थापना, खासगी प्रवासी वाहनातून विद्यार्थी वाहतूक, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून कारवाई करावी, असे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिले. विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही सर्वांची जबाबदारी आहे. ती सर्वांनी प्राधान्याने पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा स्कूलबस सुरक्षितता समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक फूलचंद मेंगडे आदींसह पालक, शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीला सदस्य सचिव म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी मागील बैठकीच्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संगणकीय सादरीकरणाद्वारे सादर केला. परिवहन विभागामार्फत जिल्ह्यातील विविध शाळांना रस्ता सुरक्षाविषयक करण्यात आलेले प्रबोधन, अल्पवयीन वाहनचालकांची तपासणी करून केलेली कारवाई, मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांची केलेली तपासणी तसेच जिल्ह्यातील १०० पेक्षा जास्त शाळा व महाविद्यालयांमध्ये केलेले रस्ता सुरक्षाविषयक प्रबोधन तसेच जिल्ह्यातील काही शाळांमध्ये रस्ता सुरक्षाविषयक चिन्हांची माहिती असणाऱ्या स्कूलबॅगचे विद्यार्थ्यांना केलेल्या वाटपाची माहिती त्यांनी दिली.

पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी बैठकीत सर्वांना सूचना केल्या. ते म्हणाले, सर्व शाळांनी आपल्या शाळेमध्ये परिवहन समितीची स्थापना करावी. त्यांच्या बैठका वारंवार घ्याव्यात. राज्य परिवहन महामंडळाने शाळांच्या मागणीनुसार शाळा भरणे व सुटण्याच्या वेळी एसटी बसेसची व्यवस्था करावी. सर्व शाळांनी आपल्या सर्व परिसरामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत प्रयत्न करावेत. ‘हेल्पलाईन’ वर तक्रार करा शालेय वाहतुकीच्या तक्रारीसंदर्भात उपप्रादेशिक परिवहन विभाग रत्नागिरीमार्फत जारी करण्यात आलेले हेल्पलाईन क्रमांक ०२३५२-२२९४४४ व मोबाईल क्रमांक ८२७५१०१७७९ यावरती तक्रार करावी.

तसेच, पोलिस विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या ११२ या टोल फ्री क्रमांकावरती न घाबरता गुन्ह्याची माहिती दिल्यास पोलिस मदतीला उपलब्ध होतील. नागरिकांनी न घाबरता यांचा वापर करावा, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular