26.4 C
Ratnagiri
Tuesday, June 24, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeKhedजगबुडीतील गाळाचा प्रश्न सुटणार, नागरिकांना दिलासा

जगबुडीतील गाळाचा प्रश्न सुटणार, नागरिकांना दिलासा

या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.

खेड शहरातून वाहणाऱ्या जगबुडी नदीतील गाळ काढण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. महिनाभरात सीआरझेडची परवानगी मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापूर्वी खेड जगबुडी नदीतील गाळ काढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे खेड बाजारपेठेतील ३५० व्यापारी, ५०० कुटुंबांची पुरापासून सुटका होईल. खेड शहरातील जगबुडी नदीतील भरणे पूल ते समुद्राला मिळणारा नदीकिनारा सीआरझेड सागरी प्रभाव क्षेत्रात मोडतो. पावसाळ्यात पूर परिस्थितीत समुद्राचे पाणी ज्या ठिकाणापर्यंत येते त्या भागापासून पुढे ५०० मीटरपर्यंत असलेला सर्व भाग सीआरझेडमध्ये येतो. या परिसरात जगबुडी नदीचा प्रवाह हा खेड शहरापासून जवळच असल्याने पावसाळ्यात जगबुडी नदीच्या पुराचे पाणी खेड शहरात शिरते.

याबाबत येथील व्यापाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी राजेश्री मोरे यांची भेट घेऊन गाळ काढण्यासाठी पाठपुरावा केला होता; मात्र सीआरझेडच्या परवानगीशिवाय गाळ काढणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. जगबुडी नदीतील गाळ काढला न गेल्यामुळे शहरात पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. गाळ काढण्यासाठी सीआरझेडची परवानगी मिळावी म्हणून खासगी एजन्सीमार्फत नदीची पाहणी करून अंतिम प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.

महिन्याभरात परवानगी मिळण्याची शक्यता – नदीतील गाळ काढण्यासाठी सीआरझेड कायद्याची येत्या महिनाभरात परवानगी मिळेल, अशी माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. सीआरझेड परवानगी मिळाल्यानंतर जगबुडी नदीतील गाळ काढण्यासाठी जिल्हाधिकारी जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद करून यांत्रिक विभाग अलोरे यांच्याकडील यंत्रसामुग्रीने गाळ काढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular