27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान…

वादळी वाऱ्यासंह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला...

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....
HomeRatnagiriपोलीस भरतीच्या परीक्षेत चुकीचे प्रश्न - या प्रश्नाचे सर्व गुण मिळणार

पोलीस भरतीच्या परीक्षेत चुकीचे प्रश्न – या प्रश्नाचे सर्व गुण मिळणार

रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या पोलीस भरतीमधील लेखी परीक्षेत अनेक प्रश्न चुकीचे होते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. प्रश्न चुकीचे असल्याने या प्रश्नाचे सर्व गुण परीक्षार्थीना देण्याचा निर्णय जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा २ एप्रिलला झाली. या लेखी परीक्षेमध्ये ए,बी,सी,डी असे ४ प्रश्नसंच होते. विशेष म्हणजे या चारही प्रश्नसंचांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. प्रत्येक प्रश्नसंचामधील काही प्रश्न चुकले आहेत. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचा गोंधळ उडाला. अखेर हे प्रश्नसंच चुकीचे असल्याचे डीएसपींच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यांनी त्यानंतर या प्रश्नांचे सर्व गुण परीक्षार्थीना दिले जातील असा निर्णय घेतला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular