26.7 C
Ratnagiri
Saturday, July 19, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeRatnagiri१३ बांगलादेशी नागरिकांचे केले प्रत्यार्पण एजन्सीकडून कार्यवाही

१३ बांगलादेशी नागरिकांचे केले प्रत्यार्पण एजन्सीकडून कार्यवाही

बांगलादेशी नागरिकांना २० मे रोजी त्यांच्या मायदेशी परत पाठविण्यात आले.

नागरिकत्व नसताना रत्नागिरीत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १३ दोषी बांगलादेशी आरोपींचे प्रत्यार्पण करण्याची कार्यवाही एजन्सीकडून पूर्ण केली. २० मे रोजी त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्यात रत्नागिरी पोलिस दलाला यश आले. रत्नागिरी जिल्हा पोलिसदलाच्या दहशतवादी विरोधी पथकाला ११ नोव्हेंबर २०२४ ला एक माहिती मिळाली होती की, पूर्णगड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये, भारतामध्ये अनधिकृत प्रवेश केलेले बांगलादेशी नागरिक राहत आहेत. त्याआधारे पोलिसांनी छापा टाकला. त्या कारवाईत १३ बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले. वाहिद रियाज सरदार, रिजऊल हुसेन कारीकर, शरिफुल हौजिअर सरदार, फारूख महमंद जहिरली मुल्ला, हमीद मुसाफा मुल्ला, राजू अहमंद हजरतअली शेख, बाकीबिलाह अमिर हुसेन सरदार, सैदूर रेहमान मुबारक अली, आलमगीर हुसेन हिरा अबदुल कादर दलाल, मोहम्मद शाहेन समद सरदार, मोहम्मद नुरूझामन मोरोल बालायत अली, मोहम्मद नुरहसन जहर सरदार, मोहम्मद लालतू मोंदल किताब अली अशी त्यांची नावे आहेत. रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने या सर्व १३ दोषी बांगलादेशी आरोपींना प्रत्यार्पण करण्याबाबतची कार्यवाही संबंधित एजन्सी यांच्याकडे पाठपुरावा करून करण्यात आली. या सर्व बांगलादेशी नागरिकांना २० मे रोजी त्यांच्या मायदेशी परत पाठविण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular