26.3 C
Ratnagiri
Tuesday, April 22, 2025

खराब तापमानामुळे सागरी मासेमारीवर परिणाम

सर्वसाधारणपणे गुढीपाडवा झाला की समुद्रात नव्याने मासळी...

शेकाप नेत्याच्या दोन मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे...

रत्नागिरीत खेडशी परिसरात उपयुक्त पाळीव प्राणी मुंडकं छाटलेल्या स्थितीत सापडल्याने संताप

रत्नागिरी तालुक्यात रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर खेडशी...
HomeRatnagiriचाकरमानी कोकणात होताहेत दाखल, एसटी महामंडळातर्फे ४८०० जादा बसफेऱ्या

चाकरमानी कोकणात होताहेत दाखल, एसटी महामंडळातर्फे ४८०० जादा बसफेऱ्या

जिल्ह्यात ४ सप्टेंबरपासून जादा गाड्या येण्यास प्रारंभ होणार आहे. 

लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आता फक्त चार दिवस शिल्लक राहिले असून लाखो चाकरमान्यांना कोकणात परत येण्याचे वेध लागले आहेत. मुंबईतून कोकणात उत्सवासाठी येणाऱ्या गणेशभक्तांसाठी एसटी महामंडळाने जादा गाड्यांची व्यवस्था केली असून रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ४ हजार ८०० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. ४ सप्टेंबरपासून जादा बसफेऱ्या कोकणात दाखल होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात २५०० पेक्षा जास्त गाड्या येणार आहेत. जिल्ह्यात ४ सप्टेंबरपासून जादा गाड्या येण्यास प्रारंभ होणार आहे.

४ ला ६००, तर ५ ला सर्वाधिक म्हणजेच ३ हजार गाड्या येणार आहेत. ६ सप्टेंबरला एक हजार, ७ ला ३०० जादा गाड्या येणार आहेत. गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, उपाहारगृहातून पुरेशा खाद्यपदार्थांची व्यवस्था, प्रसाधनगृह स्वच्छतेबाबत प्रशासनाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. परतीसाठी गौरी- गणपती विसर्जनापासून म्हणजे १२ सप्टेंबरपासून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत १७०० जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले असून, दोन हजारांपेक्षा जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular