28.8 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

रत्नागिरीत अमली पदार्थ बाळगणारे ७ जण अटकेत

शहराजवळील भाट्ये गावामध्ये गांजा बाळगणाऱ्या ५ तरुणांविरुद्ध...

रत्नागिरी पालिकेत ५५ कंत्राटींना डच्चू…

आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रत्नागिरी पालिकेने आर्थिक शिस्त...

७२ तासानंतर महिलेचा मृतदेह सापडला, चर्चाना फुटलंय पेव

तब्बल ७२ तासांच्या प्रयत्नानंतर अखेर अश्विनी अहिरेचा...
HomeRajapurराजापूर-उन्हाळेतील गंगा दहा महिन्यांनंतरही प्रवाही

राजापूर-उन्हाळेतील गंगा दहा महिन्यांनंतरही प्रवाही

गंगामाईचे उन्हाळे येथील तीर्थक्षेत्री दर तीन वर्षांनंतर आगमन होते.

गतवर्षी मार्च महिन्यामध्ये शिमगोत्सवाचा ढोल घुमू लागताच होळी पौर्णिमेच्या पहाटेच्या दरम्यान उन्हाळे येथील गंगातीर्थक्षेत्री गंगामाईचे आगमन झाले होते. त्यानंतर, गेल्या सुमारे दहा महिन्यांपासून गंगामाईचे उन्हाळे तीर्थक्षेत्री प्रवाहीपणे वास्तव्य कायम राहिलेले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गंगामाईचे आगमन आणि निर्गमनामध्ये स्थित्यंतर आलेले असताना गंगामाईच्या मूळ गंगा, गायमुख आणि चौदा कुंडांमधील पाण्यामध्ये गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये मात्र, फारसा कोणताही कमी-जास्त प्रमाणात फरक झालेला नसल्याचे गंगा देवस्थानचे अध्यक्ष श्रीकांत घुगरे यांनी सांगितले. वास्तव्याच्या काळामध्ये सुमारे साडेचार लाख भाविकांनी गंगास्नानाची अनुभूती घेतली असून, त्यामध्ये राज्याबाहेरील भाविकांचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गतवर्षी मार्च महिन्यामध्ये गंगामाईचे उन्हाळे तीर्थक्षेत्री आगमन झाले. त्यानंतर अजूनही गंगामाई उन्हाळे तीर्थक्षेत्री प्रवाही आहे. गंगास्नान हे पवित्र स्नान मानले जात असल्याने गंगामाईच्या वास्तव्याच्या काळामध्ये राज्यासह राज्याबाहेरील लाखो भाविक पवित्र गंगास्नानाची पर्वणी साधण्यासाठी तीर्थक्षेत्री येतात. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात, आदी राज्यांतील लाखो भाविकांनी  गंगास्नानाचा लाभ घेतला.

२०११ पासून गंगेचे दरवर्षी आगमन – पाताळातून प्रकट होणाऱ्या गंगामाईचे उन्हाळे येथील तीर्थक्षेत्री दर तीन वर्षांनंतर आगमन होते. आगमनानंतर पुढील सर्वसाधारण तीन महिने गंगामाईचे या ठिकाणी वास्तव्य असल्याचा इतिहास आहे. अठराव्या शतकात सलग ३७ वर्षे (१८०१-१८३७) दरवर्षी येणारी गंगा त्या नंतरच्या काळामध्ये सर्वसाधारणपणे तीन वर्षांनंतर येत होती; मात्र २०११ पासून सातत्याने दरवर्षी गंगामाईचे आगमन होत असल्याचे चित्र आहे. २००९ पूर्वीच्या गंगामाईच्या वास्तव्याचा विचार करता सर्वसाधारणपणे ते सरासरी अडीच-तीन महिने वास्तव्य राहिले आहे. मात्र, त्यानंतरचे तिचे वास्तव्य पाहता ते शंभरहून अधिक दिवस वास्तव्य असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

RELATED ARTICLES

Most Popular