26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriरत्नागिरीत एप्रिलपासून होणार पाण्याची कपात

रत्नागिरीत एप्रिलपासून होणार पाण्याची कपात

एप्रिलपासून प्रत्येक सोमवारी पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी दुप्पट साठा आहे; परंतु वाढता उष्मा आणि भविष्यात १५ जूनपर्यंत शहरवासीयांना टंचाईला तोंड द्यावे लागू नये, यासाठी पाणी वाटपाचे नियोजन केले आहे. एप्रिलपासून पाणी कपातीला सुरुवात केली जाईल. ३० मार्चला गुढीपाडवा आणि ३१ ला ईद असल्याने एप्रिलपासून दर सोमवारी कपातीला सुरुवात केली जाणार आहे. पालिका प्रशासनाने याला दुजोरा दिला. शीळ धरणात पावसाळा सुरू होईपर्यंत पाणीसाठा पुरणारा असला तरी उन्हाळ्याचा तडाखा वाढल्याने शिमगा संपल्यानंतर म्हणजेच रंगपंचमीनंतर प्रत्येक सोमवारचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याबाबत विचार सुरू झाला आहे. शीळ धरणाची पाणी साठवण क्षमता ३.६६६ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. अलनिनोच्या प्रभावामुळे पावसाळासुद्धा लांबणीवर पडण्याची हवामान खात्याने भीती व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात १.६५ दशलक्ष घनमीटर साठा असताना आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला होता.

त्यानंतर एप्रिलपासून पावसाळा सुरू होईपर्यंत प्रत्येक सोमवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला होता. हा पाणीपुरवठाः समाधानकारक पाऊस झाल्यानंतर ४ जुलैपासून नियमितः करण्यात आला होता. शीळ धरणातील साठ्याच्या पाहणीनुसार २.०५१ दशलक्ष घनमीटर पाणी असल्याचे पातळीची मोजमापः करणाऱ्या पाटबंधारे विभागामार्फत सांगण्यात येत आहे. रत्नागिरी शहरात सुमारे ११ हजार नळजोडण्या आहेत. धरणातील सध्याचा पाणीसाठा पावसाळा नियमित होईपर्यंत पुरणारा आहे; परंतु सध्या कडाक्याच्या उन्हामुळे धरणातील साठ्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे पाणीसाठा कमी होण्याची शक्यता असते.

पालिकेच्या पाणी विभागाने पाणीपुरवठा व्यवस्था प्रतिबंधात्मक देखभाल व दुरुस्तीकरिता बाष्पीभवनाचा धोका ओळखून पाण्याचे नियोजन सुरू केले आहे. २४ मार्चपासून आठवड्यातील प्रत्येक सोमवारी पाणी कपात करण्यात येणार होती; परंतु गुढीपाडवा आणि ईद सणांचा विचार करून पालिकेने हे नियोजन पुढे ढकलले आहे. एप्रिलपासून प्रत्येक सोमवारी पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular