30.6 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeRatnagiriरत्नागिरीतील तरुणांसाठी स्पर्धा परिक्षा केंद्र मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात सुरू करणे गरजेचे

रत्नागिरीतील तरुणांसाठी स्पर्धा परिक्षा केंद्र मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात सुरू करणे गरजेचे

महाराष्ट्र शासन व शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रात अध्ययावत लायब्ररी, स्टडी मटेरियल, व मार्गदर्शक उपलब्ध करून देवून शासनाने या विद्यार्थ्या यांचे मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.

सध्या एमपीएससी आणि युपीएससी परीक्षांमध्ये कोकणच्या मुलांची दमदार कामगिरी लक्षात घेता रत्नागिरी मध्ये देखील जवळपास स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन स्पेशल केंद्र असणे गरजेचे आहे. युपीएससीच्या परीक्षेत देशात एकूण ७४९ उमेदवार यशस्वी ठरले. राज्यात मुळ चिपळूणची परंतु, सध्या मुंबईला वास्तव्याला असलेली प्रियवंदा म्हाडदळकर प्रथम आली तसेच खेडचा अक्षय महाडिक, रत्नागिरीचा चेतन पंदेरे अशा काही मुलांनी चमकदार कामगिरी केली.

सातत्याने दहा वर्ष कोकण बोर्ड महाराष्ट्रात प्रथम आहे. कोकणातील विद्यार्थी हुशार व मेहनती आहेत. परंतु त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. विद्यार्थी , शिक्षक , पालक व शिक्षणंसंस्था या सर्वांनी चळवळीच्या मार्गाने सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत. महाराष्ट्र शासन व शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रात अध्ययावत लायब्ररी, स्टडी मटेरियल, व मार्गदर्शक उपलब्ध करून देवून शासनाने या विद्यार्थ्या यांचे मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. तसेच हे केंद्र निवासी व्यवस्थासहित आदर्श ठरले पाहिजे.

कोकणातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले पाहिजे. कष्ट, नियोजन, वाचन, ग्रुप डिस्कशन आणि स्वतःची लेखनशैली विकसित करून नवनवीन संधी शोधली पाहिजे. पालकांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. महाड येथे जन्मलेल्या सीडी देशमुख यांनी १९१८ साली इंग्लंड येथे जाऊन आयसीएस परिक्षेत विक्रमी यश संपादन केले होते आपण तो वारसा कसोशीने जपला पाहिजे असे प्रतिपादन शिक्षण विषयातील तज्ञ ॲड. विलास पाटणे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular