27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान…

वादळी वाऱ्यासंह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला...

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....
HomeRatnagiriजोरदार वाऱ्यामुळे मासेमारीला अटकाव

जोरदार वाऱ्यामुळे मासेमारीला अटकाव

मतलई वाऱ्यांमुळे मच्छीमारी नौका समुद्रात नेणे धोकादायक असते.

समुद्रात झालेली वादळे, हवामानात झालेला बदल यामुळे आधीच मच्छीमारी व्यवसाय अडचणीत आला असताना, आता समुद्रात सुटलेल्या मतलई वाऱ्यामुळे मासेमारी ठप्प झाली आहे. त्यामुळे मच्छीमारांचे नुकसान होत आहे. लहरी हवामानामुळे मत्स्यदुष्काळाचे संकट मासेमारी उद्योगासमोर उभे ठाकले असून, मासेमारी करणारे व्यावसायिक चिंतेत पडले आहेत. यावर्षी ऑगस्टपासून सुरू झालेल्या मासेमारी हंगामाला अद्याप सूर सापडलेला नाही. मच्छीमारी हंगाम सुरू झाल्यापासून समुद्रात झालेल्या वादळांचा परिणाम मच्छीमारी व्यवसायावर झाला आहे.

बदलत्या हवामानामुळे मासे मिळण्याचे प्रमाण घटत चालले आहे. परिणामी, हजारो रुपयांचे इंधन खर्च करून बोट समुद्रात नेल्यावर मासळी हाताशी लागत नसल्याने मच्छीमारांच्या पदरी निराशा येत आहे. आता मतलई वाऱ्यांमुळे मासेमारीवर परिणाम होत आहे. मतलई वाऱ्यांमुळे मच्छीमारी नौका समुद्रात नेणे धोकादायक असते. या वाऱ्यामुळे मासे पकडण्यासाठी जाळी टाकण्यात अनेक अडथळे येतात. त्यामुळे अनेक नौका किनाऱ्यावर आहेत. कमी मासळीमुळे किंमतीत वाढ होणार असल्याने त्याचा फटका खवय्यांना बसणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular