25.2 C
Ratnagiri
Saturday, January 25, 2025

जिल्ह्यात घुसलेल्या बांगलादेशींचा शोध घेऊन वितरण मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून बांगलादेशी घुसखोर...

मालगुंड होणार आता पुस्तकांचे गाव मराठी भाषामंत्री उदय सामंत

रत्नागिरी तालुक्यातील पातील मालगुंड गावाला पुस्तकांचे गाव...

वाशिष्ठीतील गाळ उपशासाठी यंत्रसामुग्री वाढवा आमदार निकम

वाशिष्ठो नदीतील गाळ उपसा कामासाठी पुरेसा निधी...
HomeChiplun'त्या' वाळू उपशावर कारवाईचे आदेश - जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

‘त्या’ वाळू उपशावर कारवाईचे आदेश – जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

काही महिन्यांपासून रात्रंदिवस सक्शन पंपाद्वारे बेकायदा वाळू उत्खनन केले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने संक्शन पंपाने वाळू उपसण्यावर बंदी आणलेली असतानाही संक्शन पंपाने वाळू उपसा येथील करबंवणे-बहिरवली खाडीत अवैधपणे सुरू आहे. याप्रकरणी अनेक तक्रारी होत असल्याने याबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी गंभीर दखल घेत चिपळूणचे तहसीलदार प्रवीण लोकरे यांना नुकताच एका पत्राद्वारे जाब विचारला आहे. याबाबत तातडीने कारवाई करून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. तालुक्यातील करंबवणे-बहिरवली खाडीत गेल्या काही महिन्यांपासून रात्रंदिवस सक्शन पंपाद्वारे बेकायदा वाळू उत्खनन केले जात असल्याची ओरड सुरू आहे. याबाबत संबंधित मंडल अधिकारी तलाठी व स्थानिक अधिकारी याकडे कानाडोळा करत असल्याच्या तक्रारी होत आहेत. वाळू उत्खननासह होणाऱ्या चोरट्या वाहतुकीच्याही अनेक तक्रारी चिपळूण तहसीलदार व महसूल विभागाकडे सातत्याने फोनद्वारे झाल्या आहेत; मात्र तरीही कारवाई होत नाही.

त्यामुळे चोरटा वाळू व्यवसाय तेजीत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा खनीकर्म विभागाने येथे कारवाई केली होती; मात्र त्यानंतरही चोरटा वाळू व्यवसाय सुरू आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने संक्शन पंपाने वाळू उत्खनन करण्यास बंदी घातली आहे. संक्शन पंपाने वाळू उपसा केल्याने होणाऱ्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर बंदी घातली आहे; मात्र तरीही करंबवणे, मालदोली गावातून संक्शन पंपाद्वारे वाळू उपसा अवैध बेकायदेशीर आणि विना रॉयल्टी वाळू उत्खनन सुरू आहे. वाळू उत्खनन संक्शन पंपाने होत असल्याबाबतचे तीन तक्रार अर्ज चिपळूण तहसीलदार लोकरे यांच्याकडे देऊनही कारवाई होत नसल्याचे संबंधित तक्रारदाराने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारअर्जात नमूद केले आहे. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी या विषयी गंभीरपणे दखल घेत याबाबतचा जाब विचारला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular