26.4 C
Ratnagiri
Tuesday, June 24, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeChiplunनोव्हेंबर अखेरपर्यंत एन्रॉन पुलाची दुरुस्ती सुरू

नोव्हेंबर अखेरपर्यंत एन्रॉन पुलाची दुरुस्ती सुरू

दोन्ही बाजूने पूल खालच्या दिशेने खचला.

२०२१ च्या महापुरात खचलेल्या शहरातील एन्रॉन पुलाच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. मे महिन्यात संबंधित ठेकेदाराने पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केल्याने या पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. दरम्यान, पावसाळ्यात बंद ठेवण्यात आलेले हे काम नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यातील दुरुस्तीचे काम मार्गी लागल्यानंतर या पुलावरून अवजड वाहनेही धावणार आहेत. महापुरात एन्रॉन पुलाचा एक पिलर खचला होता. यामुळे दोन्ही बाजूने पूल खालच्या दिशेने खचला. परिणामी, या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती.

तरीही काही मोटार सायकलस्वार या धोकादायक पुलावरून दुचाकी नेत होते. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या दोन्ही बाजूला खड्डे खणून पूल वाहतुकीसाठी बंद केला. यानंतर या पुलाचे काम मार्गी लागावे यासाठी स्थानिक नागरिक व आमदार शेखर निकम यांनी सातत्याने पाठपुरावा केला. सार्वजनिक बांधकाम विभागाने दोनवेळा या पुलाच्या दुरुस्तीची निविदा काढली; मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर तिसऱ्यावेळी ‘देवरे अँड सन्स’ या नाशिकमधील कंपनीला पुलाच्या दुरुस्तीचा ठेका देण्यात आला. कंपनीने पावसाळ्यापूर्वी या कामाला सुरवात केली. पहिल्या टप्प्यात खचलेल्या ठिकाणचा स्लॅब उखडून आतील स्टील मोकळे केले.

जो पिलर खचला होता त्या पिलरच्या बाजूने हायड्रोलिक जॅक लावून खचलेला स्लॅब दोन्ही बाजूने वर उचलण्यात आला. खचलेला एन्रॉन पूल समपातळीत आणण्यात आला. मे अखेरीसपासून या पुलावरून दुचाकी तसेच तीनचाकी रिक्षा वाहतुकीसाठी सोडल्या जात आहेत. किमान दुचाकी तसेच रिक्षासाठी एन्रॉन पुलावरील वाहतूक सुरू झाल्याने बायपासमार्गे मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर तसेच शहरात जाणे-येण्यासाठी नागरिकांना दिलासा मिळाला आहे; मात्र अवजड वाहतूक बंदच असल्याने मोठ्या वाहनांना गोवळकोट रोड, पेठमापमार्गे वळसा घेऊन प्रवास `करावा लागत आहे. यामध्ये वाहतूककोंडीचीही समस्या वारंवार उभी राहात आहे तर असंख्य अवजड वाहनांना बहादूरशेखमार्गेच प्रवास करावा लागत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular