25.4 C
Ratnagiri
Thursday, October 5, 2023

दोन महामार्गाचे काम अद्याप अर्धवत, तिसऱ्या महामार्गाला मंजुरी

मुंबई-गोवा महामार्ग आणि रेवस-रेड्डी महामार्गाचे काम अद्यापही...

भाट्ये, कर्ला समुद्रकिनारी पाण्याला जोरदार करंट

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये...

आमदार भास्कर जाधव सरकारविरोधात न्यायालयात

आमदार भास्कर जाधव यांनी आमदार निधीवाटपात दुजाभाव...
HomeChiplunसागरी महामार्ग वैभव नष्ट करणार - शाहनवाज शाह

सागरी महामार्ग वैभव नष्ट करणार – शाहनवाज शाह

सागरी महामार्ग केला तर पुन्हा निसर्गाचे वाटोळे लागणार आहे.

सागरी महामार्गावर एवढा खर्च करण्याची गरज काय? सागरी महामार्ग कशासाठी हवा आहे? सागरी महामार्ग करून आपण आपले वैभव नष्ट करणार आहोत. यामुळे कोकणचे फार मोठे नुकसान होणार आहे व फायदा होणार आहे, तो राजकीय लोकांचा व ठेकेदारांचा, असे प्रतिपादन जलदूत आणि सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज शाह यानी केले आहे. सध्या सागरी महामार्गाबाबत चर्चा सुरू असून, त्यामध्ये वेगळे मत व्यक्त करताना शाह म्हणाले, ‘कोकणचे वैभव म्हणजे येथील निसर्गसंपत्ती मग ६० कि.मी.च्या टप्प्यात हा हायवे कशासाठी? इतर शहरे नष्ट होणार आहेत. सागरी महामार्ग केला तर पुन्हा निसर्गाचे वाटोळे लागणार आहे.

गरज आहे ती फक्त पर्यटकांना सहज सुलभरित्या समुद्रकिनारी येण्यासाठी व पर्यटकांना पाहायचे आहे ते कोकणची निसर्गसमृद्धी, समुद्रकिनारे. त्यांना हवे आहे निसर्गाच्या सान्निध्यात राहणे, चुलीवरचे मटण, झोपडी, पाणी, पक्षी, प्रदूषणमुक्त जागा. मग आहे हा रस्ता फक्त व्यवस्थित करणे व ते टिकवणे इतकेच काम केले तर पुरेसे आहे. हा रस्ता मोठी वाहने व ट्रेलरकरिता मोठा केला गेला तर ही सर्व निसर्गसमृद्धी नष्ट होणार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. कोकणातील मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण गेली अनेक वर्षे रखडले. हा महामार्ग बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्त्वावर होणार होता; परंतु या मार्गावर वाहतूक कमी असल्याने व भविष्यात त्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाही म्हणून शासनाने धोरण बदलले.

या महामार्गाचे चौपदरीकरण करताना निसर्गाचे वाटोळे लावण्यात आले. कार्बनडाय ऑक्साइड शोषून घेणारी व ऑक्सिजन देणारी, भूजलसाठा वाढवणारी, जैवविविधता जपणारी महाकाय वृक्ष मोठ्या प्रमाणात तोडण्यात आली. डोंगरदऱ्या फोडण्यात आल्या. अनेक गावांवर दरडी कोसळून ती नेस्तनाबूत होण्याची टांगती तलवार त्या गावांवर सदैव राहणार आहे. सागरी महामार्ग करून हेच ओढवून घ्यायचा आहे का, असा सवाल त्यानी केला.

RELATED ARTICLES

Most Popular