28 C
Ratnagiri
Tuesday, June 10, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeSportsविराटला तिसऱ्या टी-२० मधून विश्रांती

विराटला तिसऱ्या टी-२० मधून विश्रांती

तिसऱ्या सामन्यातून विश्रांती घेतल्यानंतर विराट कोहली कुटुंबीयांना भेटण्यासाठी मुंबईला रवाना झाला

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने तिरुअनंतपुरम आणि गुवाहाटी येथे झालेले पहिले दोन सामने जिंकून मालिका आधीच जिंकली आहे. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाने स्टार फलंदाज विराट कोहलीला तिसऱ्या सामन्यातून विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.

तिसऱ्या सामन्यातून विश्रांती घेतल्यानंतर विराट कोहली कुटुंबीयांना भेटण्यासाठी मुंबईला रवाना झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यात त्याने नाबाद ३ आणि ४९ धावांची खेळी केली. या महिन्यात ऑस्ट्रेलियात विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. हे पाहता विराटला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विराटच्या अनुपस्थितीत आता श्रेयस अय्यरला तिसऱ्या टी-२० सामन्यात प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळू शकते. दीपक हुडाच्या दुखापतीमुळे अय्यरचा या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला होता. पहिल्या दोन सामन्यांमध्ये अय्यरचा प्लेइंग ११ मध्ये समावेश नव्हता.

भारतीय संघ गेल्या काही सामन्यांपासून दिनेश कार्तिकला पहिला पसंतीचा यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून सामील करत आहे. त्यामुळे प्लेइंग-११ मध्ये समावेश असूनही ऋषभ पंतला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळू शकली नाही. विराटच्या अनुपस्थितीत, पंतला फलंदाजी एक्सपोजर दिली जाऊ शकते जेणेकरून त्याला विश्वचषकापूर्वी लय मिळेल. विश्वचषकासाठी जाहीर करण्यात आलेल्या १५ सदस्यीय संघात पंतचा समावेश आहे.

विराटने यापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेतून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. जवळपास तीन वर्षे आउट फॉर्म असल्याने विराटने एका महिन्याचा ब्रेक घेतला आणि यादरम्यान त्याने बॅटला हातही लावला नाही. यानंतर त्याने आशिया कपमध्ये दमदार पुनरागमन केले. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विराटने अर्धशतक झळकावले आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या सुपर-4 सामन्यात शतक झळकावले. १०२० दिवसांत विराटचे हे पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठरले.

RELATED ARTICLES

Most Popular