24 C
Ratnagiri
Thursday, February 12, 2026

दहावी – बारावी परीक्षेपूर्वी बोर्डाचं ‘डिजिटल शस्त्र’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उत्व माध्यमिक शिक्षण...

रत्नागिरीत ‘जनसुरक्षा’ कवच भक्कम जीवनज्योती विमा

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने...
HomeRatnagiriपालकमंत्र्यांच्या दौऱ्यात अनेक विकासकामांना भेट

पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात अनेक विकासकामांना भेट

रत्नागिरी येथे होणाऱ्या जनता दरबाराकरिता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पालकमंत्री श्री.सामंत यांनी केले आहे.

आज रत्नागिरीत राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी विविध विकास कामांची पाहणी केली. त्यावेळी संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज ०४ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, रत्नागिरी येथे जनता दरबार आयोजित केला आहे. या जनता दरबाराकरिता जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा प्रमुख उपस्थित राहणार असून जनता दरबाराकरिता उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना आधी टोकन क्रमांक दिले जाणार आहेत.

तरी नागरिकांनी ०४ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, रत्नागिरी येथे होणाऱ्या जनता दरबाराकरिता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पालकमंत्री श्री.सामंत यांनी केले आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांनी रहाटघर बसस्थानक आणि मध्यवर्ती बसस्थानकांची पाहणी केली. रहाटघर बसस्थानकाची रंगोटी आणि परिसर सिमेंट कॉंक्रीटीकरणसाठीचे प्रस्ताव तात्काळ सादर करा तसेच मध्यवर्ती बसस्थानकाचे काम लवकरात लवकरात होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करा, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, विभागीय अभियंता श्री. मोहिते, आगार व्यवस्थापक संदीप पाटील, विभागीय वाहतूक अधीक्षक अे.बी. पाटील उपस्थित होते.

पालकमंत्री उदय सामंत यांनी लोकमान्य टिळक स्मारक, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, तारांगण, लोकमान्य टिळक वाचनालय, रत्नागिरी नगरपरिषद आदि ठिकाणी भेट देऊन तेथील कामांची पाहणी केली. त्यानंतर पालकमंत्री श्री.सामंत यांनी जिल्हा परिषद, रत्नागिरी येथे जिल्हा. परिषदेच्या विविध विभागाच्या कामकाजाचाही आढावा घेतला.

RELATED ARTICLES

Most Popular