28.5 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeRatnagiriनिवळी येथील उड्डाणपूल रद्द करा शेकडो ग्रामस्थ उतरले रस्त्यावर

निवळी येथील उड्डाणपूल रद्द करा शेकडो ग्रामस्थ उतरले रस्त्यावर

उड्डाणपुलाचा प्रस्ताव बांधकाम विभागाने रद्द करावा अशी मागणी केली.

मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी येथील उड्डाणपूल रद्द व्हावा यासाठी. निवळीचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. शनिवारी त्यांनी एकत्र येत रस्त्यावर उतरून प्रस्तावित उड्डाणपुलाचा प्रस्ताव बांधकाम विभागाने रद्द करावा अशी मागणी केली. या मागणीसाठी निवळी आणि हातखंबा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. रत्नागिरी तालुक्यातील नाणीज येथून जाणाऱ्या मिऱ्या-नागपूर महामार्गावर आजूबाजूच्या गावाच्या सुरक्षिततेसाठी अंडर पास व्हावा व आणि मुंबई-गोवा महामार्गावर निवळी बाजारपेठेत होणारा उड्डाणपूल ऐवजी सरळ महामार्ग व्हावा अशी येथील स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि छोट्या व्यवसायिकांची मागणी आहे. मिऱ्या-नागपूर महामार्गावर काही महिन्यांपूर्वी एक दुर्दैवी अपघात होऊन दोघेजण मृत्युमुखी पडले होते. तसेच सातत्याने या भागात अपघात होत आहेत.

या महामार्गाच्या दोन्ही बाजूला लहानमोठी गावे आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी येथे महामार्गावर अंडर पास करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनाही ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. तर तीनच महिन्यापूर्वी कुडाळ-म ालवणचे आमदार निलेश राणे यांनी येथे भेट देवून ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले होते तर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. मधल्या काळात विधानसभा निवडणुका असल्याने हे काम थांबले होते. मात्र निवळीवासीय शनिवारी पुन्हा आक्रमक झाले असून दुपारी सर्वजण रस्त्यावर उतरले. यावेळी बांधकाम विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष संतोष पाध्ये, भाजपा अनुसूचित मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आणि निवळीचे उपसरपंच संजय निवळकर, हातखंबा गावचे सरपंच जितेंद्र तारवे आणि १३० हून अधिक व्यापारी आणि व्यावसायिक उपस्थित होते.

यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोष पाध्ये, संतोष डांगे, बंड्या कोकजे, सुरेश निवळकर, श्रीपद गावडे, सागवेकर, विश्राम तारवे, स्वस्तिक मालप, किरण मालप, ओमकार मालप, विठ्ठल मालप, सोहम कोकजे, पिंट्या मोहिरे, ऋषिकेश मुळे, विलास आंबेकर, श्रेयस रावणांग, ‘शेखर पांचाळ, निनाद जोशी, रमेश पटेल, हरेश पटेल, संदीप सोलकर, बंड्या जोशी, भालचंद्र शितप, संजय मालप, नितीन रेवाळे, दादा पाध्ये, दीपक कोकजे, सुनील जोशी, सुभाष मालप, दीपक राहाटे, राज् जोगळेकर, सुरेश जोगळेकर, उत्कर्ष म्हपुस्कर, विष्णू बोंबले, प्रथमेश शीतप, तानाजी गावडे, वैभव पवार, राजू निवळकर आदि उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular