27.9 C
Ratnagiri
Saturday, June 7, 2025

गुकेश – कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस – नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची...

रत्नागिरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला पकडले…

पांढरा समुद्र परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला...

उध्दव ठाकरेंचे मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत…

गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे...
HomeRatnagiriजिल्ह्यात १० दिवस झोडपून वरुणराजा शांत

जिल्ह्यात १० दिवस झोडपून वरुणराजा शांत

तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरीही दिवसभर ढगाळ वातावरण होते. वारे वाहत असल्यामुळे आज दुपारी भरतीवेळी समुद्रकिनारी उंचच उंच लाटा पाहायला मिळाल्या; मात्र त्यामुळे कुठेही नुकसान झालेले नाही. पावसामुळे घरं-गोठे कोसळून, विहिरीची संरक्षक भिंत पडल्याने जिल्ह्यात सुमारे २२ लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. लांजा येथे पेंटिंगचे काम करणारा तरुण विजेचा धक्का लागून जखमी झाला आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी उद्यापर्यंत (ता. २९) ऑरेंज अर्ट दिला आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवारी (ता. २८) सकाळी ८.३० पर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २८.५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यात मंडणगड १, खेड ९.५७, दापोली ४, चिपळूण ११.२२, गुहागर ९.६०, संगमेश्वर २८.१६, रत्नागिरी ४६.७७, लांजा ११८.८०, राजापूर २८.१३ मिमी पाऊस झाला. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर गेले दहा दिवस मुसळधार पाऊस पडत होता; मात्र आज सकाळपासून जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाला. दिवसभरात एखाद दुसरी सर पडून गेली.

दुपारी सूर्यदर्शनही झाले. एक तासानंतर पुन्हा ढगाळ वातावरण होते. सायंकाळी अचानक किनारी भागात वारे वाहण्यास सुरुवात झाली; पण पाऊस पडलेला नाही. पावसाच्या विश्रांतीमुळे लोकांनी निःश्वास टाकला. पावसामुळे जिल्ह्यात घरा-गोठ्यांचे नुकसान झाले आहे. लांजा गोंडेसखळरोड येथे पेंटिंग काम करताना ओला बांबू वीज वाहिनीला लागल्याने एका तरुणाला धक्का बसला. त्यामध्ये तो जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. संगमेश्वर धामणी-कांबळेवाडी येथे बौध्दविहारावर झाड कोसळून ४५ हजारांचे, राजापूर पन्हळेतर्फे सौंदळ येथील सुनील मोरे यांच्या घराशेजारी संरक्षक भिंत कोसळून ६० हजारांचे, धामणपे-तानवडेत संरक्षक भिंत कोसळून ५० हजारांचे, दापोली करंजाणी येथील सुलोचना कालेकर यांच्या घरावर व गोठ्यावर झाड पडून ५० हजारांचे, खेर्डीतील गंगाराम भुवड यांच्या गोठ्याचे ७५ हजारांचे, मुरुड-कर्दे येथे सुमती दुबळे यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळून १ लाख ३३ हजारांचे, शिवाजीनगर येथे रघुनाथ महाडिक यांची सार्वजनिक विहीर कोसळून आठ लाखांचे, खेर्डी येथील संतोष भुवड यांचा गोठा कोसळून ८० हजारांचे, लाडघर करंजगाव येथील प्रफुल्ल मोरे यांच्या गोठ्याचे ३५ हजार.

निगडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंतीचे ७५ हजार, पणदेरी येथील पुष्पा नवाल यांच्या घराचे ५० हजार, मधुकर पावशे यांच्या घराचे ५० हजार, वैशाली पोवार यांच्या घराचे ३० हजार, हर्णे येथील फकीर महंमद मजगावकर यांच्या घराचे ३५ हजार, काशी कुलबावकर यांच्या घराचे ३० हजार, जयश्री कुलबावकर यांच्या घराचे २५ हजार, हर्णे येथील सईदा अलवी यांच्या घराचे दोन लाख, पणदेरी येथील दिलीप नवार यांच्या दुकानाचे ५० हजार, भोपण येथील शंकर पालशेतकर यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळून दीड लाख, अशोक आंबेकर यांच्या घराचे साठ हजार, वावघर-भांगणेवाडी येथे रामचंद्र आग्रे यांच्या घराचे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून ८० हजारांचे नुकसान झाले.

किनारी भागाला इशारा – अमावस्या काल संपल्यानंतर पुढील दोन दिवस भरतीवेळी समुद्राच्या लाटांचा धोका किनारी भागांना असतो. त्यानुसार हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा किनारी भागांना दिलेला होता. मिऱ्या किनारी नवीन बंधाऱ्यावर मोठ्या लाटा होत्या. गणपतीपुळे किनारी काही पर्यटक लाटांचा आनंद घेण्यासाठी धोका पत्करत होते.

RELATED ARTICLES

Most Popular