28.5 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeRatnagiriसिमकार्ड कागदपत्रे पडताळणी, एकाची ऑनलाईन फसवणूक

सिमकार्ड कागदपत्रे पडताळणी, एकाची ऑनलाईन फसवणूक

अनेकदा अलर्ट करून सुद्धा अनेक जण ऑनलाईन फसवणुकीची शिकार होताना दिसत आहेत. मोबाईल हि सध्या प्रत्येकाच्या बेसिक नीड मध्ये बसणारी गोष्ट आहे. जगाच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकापर्यंत मोबाईलच्या माध्यमातून आपण सर्व व्यवहार करून शकतो. परंतु त्यामध्ये बाळगावी लागणारी सावधता सुद्धा वेळोवेळी ध्यान्यात ठेवणे तेवढेच गरजेचे आहे. वेळोवेळी कागदपत्र अपडेट करणे गरजेचे आहे.    

रत्नागिरी मधील कोतवडे परिसरामध्ये अशीच एक फसवणुकीची घटना घडली आहे. एमटीएनएल सिमकार्डच्या कागदपत्रे पडताळणी करायची बतावणी करत, एकाच्या बँक खात्यातून सुमारे ५० हजार रुपये काढून ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे .याप्रकरणी अज्ञाता विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखर केली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी मिलिंद निळकंठ देउस्कर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली. घडलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी सायंकाळी ते घरी असताना त्यांना अज्ञात व्यक्तीचा फोन त्यांच्या संपर्क क्रमांकावर आला. मी बांद्रा येथील एमटीएनएल ऑफीसमधून बोलत असून तुमच्या नावे असलेल्या सिमकार्डची कागदपत्रे व्हेरिफाय करायची असल्याचे त्याने सांगितले.

संबंधित व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवत देउस्कर यांनी त्याला सिमकार्डबाबत सर्व माहिती दिली. त्यानंतर त्याने देउस्कर यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर मिलिंद देउस्कर यांना त्यांच्या बँक खात्यातून एकूण ४९ हजार ३१० रुपये काढण्यात आल्याचे लक्षात आले. आणि अशा बनावट कॉलद्वारे आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच देउस्कर यांनी बँकेतून सर्व माहिती घेऊन शनिवारी रीतसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

ऑनलाईन फसवणुकी संदर्भात पोलीस, बँक, विविध फोनच्या कंपन्या सुद्धा अनेक वेळा सावध करत असतात. अशा आमिषांना, भूलथापांना बळी पडू नका असे कायम सुचवत असतात. परंतु, तरीही अनेक जण अशा फसवणूकीला बळी पडतात आणि आर्थिक नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ येते.

RELATED ARTICLES

Most Popular