नवी मुंबईच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणुका दुसऱ्यांदा दोन वर्षांच्या अवधीनंतर घेण्यात येऊ लागल्या तर यावर प्रस्थापित तसेच विरोधी पक्षातील इच्छुक उमेदवार निवडणूक लढविण्याची तयारी करत असतानाच पुन्हा एकदा कोरोना नावाच्या महामारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी निवडणूक संदर्भात कार्यक्रम चालू असतानाचा त्या सारखाच प्रकार कोरोनामुळे पुन्हा सुरू झाल्याने नियोजित निवडणूक प्रक्रियेवर कोरोनाचे सावट प्रश्नचिन्ह निर्माण करू लागले आहे.
२०२० या वर्षीच्या सुरुवातीपासून सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीच्या कार्यक्रमाला जोर धरू लागला होता. त्यावेळी मतदार यादीचे सर्व काम पूर्णत्वास जाऊन प्रसिद्ध केल्या गेल्या. प्रभाग रचनादेखील जाहीर झाली. मतदानाचा कार्यक्रम जाहीर होईल अशी अपेक्षा केली जात असतानाच अचानक कोरोनाच्या पहिल्या लाटेस प्रारंभ झाला. त्यानंतर कोरोना महामारीचा धसका निवडणूक आयोगाने घेत निवडणूक प्रक्रिया अनिश्चित काळासाठी थांबवण्याचे आदेश दिले गेले.
मागील दोन वर्षांत निवडणुकीसंदर्भात अनेक निर्णय झाले. परंतु आलेल्या दुसऱ्या व तिसऱ्या लाटेने निवडणुकी घेण्याविषयीचे निवडणूक आयोगाचे प्रयत्न अपयशी ठरले गेले. २०२२ च्या सुरुवातीपासून कोरोना महामारीचे प्रमाण बरच नियत्रंणात येऊ लागले. कोरोना नियत्रंणात येताच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या हालचालीही वेगाने सुरू करण्यात आल्या, परंतु देशात, राज्याच्या इतर भागात पुन्हा एकदा कोरोनाने उचल घेतल्याने त्याचा प्रभाव रोजच्या आकडेवारीतून पुन्हा दिसू लागला आहे. कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याचे दिसून येत असले तरी, यापूर्वी बोटावर मोजण्याइतकीच रुग्णसंख्या होती आणि मुख्य समाधानाची बाब म्हणजे मृत्यूसंख्या २०४९ या जुन्याच आकड्यावर स्थिर आहे.