28 C
Ratnagiri
Friday, June 13, 2025

रत्नदुर्गाच्या बुरूज परिसरात अतिक्रमण…

रत्नागिरीतील प्रसिद्ध रत्नदुर्ग किल्ल्याचा टेहळणी बुरूज पेठकिल्ला...

शिक्षकांना प्रशिक्षणात अपमानास्पद वागणूक – संभाजी थोरात

राज्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणामध्ये प्रथमच...

कृषी विद्यापीठाचा ई-मेल हॅक करून फसवणूक

येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या...
HomeRatnagiriतीन लाख शिधापत्रिकांची ई-केवायसी प्रलंबित पूर्तता करण्याचे आवाहन

तीन लाख शिधापत्रिकांची ई-केवायसी प्रलंबित पूर्तता करण्याचे आवाहन

ई-केवायसी प्रस्ताव ११ हजार ६३८ लोकांचे फेटाळण्यात आले.

केंद्र व राज्य सरकारने शिधापत्रिका पडताळणी आणि ई-केवायसी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामध्ये काही प्रमाणात कार्डधारकांनी ई-केवायसी केली; परंतु अजूनही जिल्ह्यात सव्वातीन लाखांहून अधिक लाभार्थ्यांची पडताळणी झालेली नाही. त्यामुळे पडताळणी राहिली आहे, अशांनी लवकर ती पूर्ण करावी, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात २ लाख ८२ हजार २७३ शिधापत्रिका आहेत. केंद्र व राज्य सरकारने शिधापत्रिका पडताळणी आणि ई-केवायसीची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात ११ लाख ३१ हजार २५६ लाभार्थी आहेत. यापैकी आधार सीडिंग झालेले १० लाख ९९ हजार ८४४ लाभार्थी आहेत. आधार पडताळणी झालेल्या लाभार्थ्यांची संख्या ४ लाख २५ हजार ६८० एवढी आहे. ई-केवायसी प्रस्ताव ११ हजार ६३८ लोकांचे फेटाळण्यात आले. रास्त भाव धान्य दुकानदारांनी पडताळणी प्रक्रिया नोंदवली; परंतु अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेले ३ लाख ६१ हजार ३५१ एवढे लाभार्थी प्रलंबित आहेत.

अद्याप ई-केवायसी पूर्तता न केल्याने ३ लाख ३२ हजार ५८७ एवढे लाभार्थी असून, आधार पडताळणी झालेल्या लाभार्थ्यांची संख्या ६९.५७ एवढी आहे. काही लाखांत लाभाथ्यर्थ्यांचे ई-केवायसी प्रस्ताव प्राप्त झालेले नसल्याने हे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ३१ मार्चपर्यंत ई-केवायसीसाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे. तहसीलदार पातळीवरून या कामासाठी पाठपुरावा होत आहे. ई-केवायसीचे काम लांजा तालुक्यात सर्वोत्तम ७७.८४ टक्के, तर सर्वांत कमी राजापुरात ५८.०४ टक्के एवढे काम झाले आहे. सर्व लामार्थ्यांनी लवकर प्रक्रिया पूर्ण करावी, यासाठी प्रशासकीय स्तरावरून आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular