26.4 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeRatnagiriरत्नागिरीमध्ये मोबाईलला स्टेटस ठेवून वकिलाची आत्महत्या

रत्नागिरीमध्ये मोबाईलला स्टेटस ठेवून वकिलाची आत्महत्या

रात्रीची वेळ आणि मुसळधार पावसामुळे शोधकार्यात अडथळे येत होते.

माझ्या मृत्यूला फक्त मी जबाबदार आहे… माझी शेवटची इच्छा म्हणून, कृपया माझ्या मित्रांची, माझ्या नातेवाइकांची, माझ्या रूम मेटची, मी राहात असलेल्या मालकांची अथवा अन्य कोणाचीही कोणतीही चौकशी करू नका, असा स्टेटस ठेवत भाट्ये पुलावरून उडी मारून रत्नागिरीतील वकिलाने आत्महत्या केली. सौरभ श्रीकृष्ण सोहनी (वय ३२, रा. थिबापॅलेस, मूळ राजापूर) असे त्यांचे नाव आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहनी हे मूळचे राजापूर तालुक्यातील रहिवासी आहेत. ते रत्नागिरीत वकिली करीत होते. मित्रासोबत ते भाड्याने राहात होते.

मित्राची गाडी घेऊन जेवायला जातो, असे सांगून ते बाहेर पडले. त्यांनी थेट भाटये पूल गाठला. भाट्ये पुलावर आल्यानंतर आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका, अशा आशयाचे स्टेटस ठेवून त्यांनी समुद्रात उडी मारली. त्यांचे स्टेटस पाहून काही वकिलांनी पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर पोलिस त्यांच्या शोधात बाहेर पडले. रात्रीची वेळ आणि मुसळधार पावसामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. आज सकाळी अॅड. सोहनी यांचा मृतदेह खडपेवठार समुद्रकिनारी तरंगताना आढळून आला. याची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular