26.2 C
Ratnagiri
Thursday, October 24, 2024

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई- गोवा बनावटीच्या मद्यासह कोटीचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी, दि. २३ (जिमाका)- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर...

या खेळाडूच्या टीम इंडियात पुनरागमनाचे भवितव्य काय…

भारत विरुद्ध न्यूझीलंड पुणे कसोटी आता जवळ...
HomeRatnagiriकोकणातील तब्बल ६१३ गावे दरडीच्या सावटाखाली

कोकणातील तब्बल ६१३ गावे दरडीच्या सावटाखाली

रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक दरडप्रवण गावे आहेत.

कोकणातील शेकडो गावे आजही दरडींच्या सावटाखाली आहेत. कोकणातील ७ जिल्ह्यांतील ६१३ गावे दरडप्रवण आहेत. या गावांपैकी २९९ गावांचे भूवैज्ञानिकांनी सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणाच्या आजपर्यंतच्या प्राप्त अहवालानुसार मुंबई उपनगर, रायगड आणि रत्नागिरी या ३ जिल्ह्यांतील ५४ गावे अतिसंवेदनशील श्रेणीत आहेत. मागील वर्षी रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीतील दुर्घटना पाहता शासनाने यावेळी उपाययोजनांवर अधिक भर देणे गरजेचे आहे. राज्याच्या पश्चिम किनारपट्टी लगतच्या डोंगररांगांमध्ये भूस्खलन होण्याचे प्रमाण जास्त आहे. या संपूर्ण किनारपट्टीच्या भागात अधिक पाऊस पडतो.

डोंगररांगांमध्ये दगडांची धूप होत असल्यामुळे गाळ तयार होतो. हा गाळ डोंगरउतारावर जमा होत असतो. अतिवृष्टी होते, तेव्हा पाणी मुरल्यामुळे पाण्याचा दाब तयार होतो. या नैसर्गिक प्रक्रियेमुळे मोठ्या प्रम ाणात निर्माण होणारा गाळ अतिरिक्त भार निर्माण करतो. ज्या ठिकाणी हा गाळ बसलेला असतो, तेथे निर्माण होणाऱ्या निसटत्या पृष्ठभागावरून त्यांची घसरण्याची प्रक्रिया सुरू होते. कोकणातील रायगड जिल्ह्यात १०३ गावे दरडप्रवण असून या सर्व गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. रायगडमधील ९ गावे अतिधोकादायक, ११ गावे मध्यम धोकादायक व ८३ गावे सौम्य धोकादायक श्रेणीत आहेत.

ठाणे जिल्ह्यातील ३६ गावे, तर पालघर जिल्ह्यातील ५४ दरडप्रवण आहेत. त्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. मुंबई शहर विभागात १७ गावे अथवा ठिकाणे दरडप्रवण असून या सर्व गावांचे भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण झाले आहे. ही १७ गावे मध्यम धोकादायक श्रेणीत आहेत. मुंबई उपनगरमध्ये ५७ गावे दरडप्रवण आहेत. या सर्व गावांचे भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण झाले असून यातील ४० गावे आहेत. अतिसंवेदनशिल श्रेणीत रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक दरडप्रवण गावे आहेत.

येथे ३०३ गावे दरडप्रवण असून १२२ गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यातील ५ गावे अत्यंत धोकादायक श्रेणीत, ९ गावे मध्यम धोकादायक, ४९ गावे कमी धोकादायक श्रेणीत आहेत. ४१ गावे चौथ्या तर १८ गावे धोकादायकच्या पाचव्या श्रेणीत आहेत, उर्वरित १८१ गावांच्या सर्वे क्षणासाठी ४ ऑगस्ट २०२३ रोजी व कळविण्यात आले असून त्याचा व अहवाल प्राप्त झालेला नाही.

RELATED ARTICLES

Most Popular