29.4 C
Ratnagiri
Saturday, December 20, 2025

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष गाडया

ख्रिसमसची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या...

बेकायदेशीर वाळू उपसा होताना दिसल्यास कारवाई होणार – जिल्हाधिकारी आक्रमक

बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत आलेल्या तक्रारीवरून आम्ही संगमेश्वरमध्ये...

रत्नागिरी शहरात भरवस्तीत बिबट्याच्या संचाराने घबराट

रत्नागिरी शहराच्या अगदी मध्यवर्ती आणि रहिवासी भाग...
HomeRatnagiriएका महिन्याची थकबाकी असली तरी वीज जोडणी तोडण्याचे आदेश

एका महिन्याची थकबाकी असली तरी वीज जोडणी तोडण्याचे आदेश

परंतु, बिल माफ होण्याच्या शक्यतेने अनेक ग्राहकांनी बिल भरण्यास नकार दिल्याने महावितरणची थकबाकी प्रचंड वाढली.

कोरोना महामारीच्या काळात महावितरण कंपनीपुढे थकीत बिलाचे मोठे आवाहन उभे राहिले. या काळात शासनाने सर्व थरातील नागरिकांना सवलती दिल्या होत्या. त्यामध्ये महावितरण कंपनीचे वीजबिल भरण्याबाबतही सवलत देण्यात आली होती. परंतु, बिल माफ होण्याच्या शक्यतेने अनेक ग्राहकांनी बिल भरण्यास नकार दिल्याने महावितरणची थकबाकी प्रचंड वाढली.

महावितरणच्या रत्नागिरी जिल्ह्यातील वीज ग्राहकांची थकबाकी कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. जिल्ह्यातील ९६ हजार ६०९ ग्राहकांनी महावितरणचे १५ कोटी २८ लाख रुपये थकवले आहेत. यामध्ये घरगुती ग्राहक सर्वांत जास्त ८४ हजार ७८८ एवढे आहेत. वाणिज्य १० हजार ३२८ आणि औद्योगिक १ हजार ४९३ ग्राहकांचा समावेश आहे. एका महिन्याची थकबाकी असली तरी वीज जोडणी तोडण्याचे आदेश कोकण परिमंडळाने दिले आहेत. त्यानुसार महावितरणने जिल्ह्यातील १६८ थकीत ग्राहकांना दणका देऊन त्यांच्या वीज जोडण्या तोडल्या. मात्र, काही ग्राहक लगेच थकबाकी भरत असल्याने हा आकडा कमी, जास्त होण्याची शक्यता देखील वर्तवता येत आहे.

थकबाकीच्या संकटाने कंपनीची आर्थिक घडीच पूर्णपणे विस्कटून गेली. महावितरण कंपनीवर मोठे आर्थिक संकट आल्यानंतर कंपनीने नियम कडक करून थकबाकी वसुली सुरू केली. तीन महिन्याचे एकदम बिल काढल्याने ग्राहकांमध्ये संताप झाला. काही राजकीय पक्षांनी याविरुद्ध आंदोलनं केली;  मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. अखेर कोरोनातील निर्बंध शिथिल करून परिस्थिती पूर्वपदावर आली तरी महावितरण कंपनीची थकबाकी मात्र कमी होण्याचे नाव घेईना.

जिल्ह्यातील थकबाकी तेव्हा ८४ कोटींच्या वर होती; मात्र थकबाकी वसुलीसाठी कंपनीने कठोर पावले उचलल्याने हळूहळू थकबाकी कमी होत आली. महावितरण कंपनीने वीजबिल जरी एक महिना थकले तरी जोडणी तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांनी घाबरून थकबाकी भरण्यास सुरुवात केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular