26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriशीळ'च्या उंचीचा प्रस्ताव बासनात, पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार गाळ काढणार

शीळ’च्या उंचीचा प्रस्ताव बासनात, पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार गाळ काढणार

धरण उंची वाढवण्याचा प्रस्ताव बासनात गुंडाळला गेला असला तरीही गाळ काढला, तर पाणीपातळी वाढणार आहे.

शीळ धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव पालिकेने बासनात गुंडाळला आहे. फणसवळे येथील ग्रामस्थांच्या विरोधानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी ही फाईल बंद करण्याचे आदेश दिले होते. त्याची तत्काळ नगरपालिकेने अंमलबजावणी केली आहे. उंची वाढवण्याऐवजी पाण्याचा अधिक साठा व्हावा म्हणून शीळ आणि पानवल धरणातील गाळ काढण्याचा प्रस्ताव पालिकेला तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत. रत्नागिरीला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाच्या उंचीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मागणीनुसार पालिकेने पाटबंधारे विभागाकडे पाठवला होता. यामध्ये शीळ धरणाची उंची सुमारे ३ मीटर म्हणजे ९ फुटाने वाढवण्यात येणार होती. हे धरण फणसवळे ग्रामपंचायत हद्दीत आहे.  शीळ धरणाची उंची वाढवण्याचा प्रश्न फणसवळेवासीयांना अडचणीचा ठरणार होता. या प्रस्तावामुळे फणसवळे ग्रामपंचायत हद्दीत नाराजी पसरली होती.

विस्थापित होण्याची ग्रामस्थांना भीती होती. यावरून स्थानिक पातळीवर राजकारणही सुरू झाले होते; मात्र पालकमंत्री सामंत यांनी फणसवळेचा दौरा केल्यावर धरणाच्या उंचीचा प्रश्नावर चर्चा झाली. त्यावर त्यांनी तत्काळ तोडगा काढून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला. धरणासंदर्भातील कार्यवाही तत्काळ थांबवण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. त्याप्रमाणे कार्यवाही थांबली. धरणाविषयीचा प्रस्ताव रद्द करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. दरम्यान, रत्नागिरी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, शीळ धरणातील साठा वाढवणे आवश्यक आहे. धरण उंची वाढवण्याचा प्रस्ताव बासनात गुंडाळला गेला असला तरीही गाळ काढला, तर पाणीपातळी वाढणार आहे. त्याचा फायदा नक्कीच भविष्यात रत्नागिरीकरांना होऊ शकतो.

RELATED ARTICLES

Most Popular