27.6 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiri१०८ रुग्णवाहिकेमुळे ९६ हजार रुग्णांना जीवदान

१०८ रुग्णवाहिकेमुळे ९६ हजार रुग्णांना जीवदान

जिल्ह्याची भौगोलिक रचना, गाव व अपुऱ्या सुविधा पाहता उपलब्ध असलेल्या १७ रुग्णवाहिका कमी पडत आहेत.

अपघात किंवा विविध आजारांवेळी रुग्णांना वेळेत उपचार मिळाले तर त्यांचा जीव वाचतो. घटनास्थळावरून रुग्णांना रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी शासनाने ठिकठिकाणी १०८ ही रुग्णवाहिकांचे जाळे निर्माण केलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १०८ च्या १७ रुग्णवाहिका उपलब्ध असून अजून ७ रुग्णवाहिकांची गरज आहे. मागील ३ वर्षात ९६ हजार ७४६ रुणांना विविध घटनांमध्ये सेवा पुरवून या रुग्णवाहिकांमुळे रुग्णांचे प्राण वाचले आहेत. जिल्ह्यात १०८ ही रुग्णवाहिका हे काम प्रामुख्याने करत आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात १७ रुग्णवाहिका उपलब्ध असून अजून ७ रुग्णवाहिकांची जिल्ह्यासाठी गरज भासत आहे.

जिल्ह्याची भौगोलिक रचना, गाव व अपुऱ्या सुविधा पाहता उपलब्ध असलेल्या १७ रुग्णवाहिका कमी पडत आहेत. ग्रामीण वस्ती, डोंगराळ भाग, रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट अशी आहे. अरुंद आणि नागमोडी वळणाचे रस्ते यामुळे १०८ रुग्णवाहिका यंत्रणेला जलदसेवा पुरवण्यास अडचणीची ठरत आहे तरीही १०८ रुणवाहिका यंत्रणा अविरत सेवा देत आहे. गेल्या तीन वर्षात एकूण ९६ हजार ७४६ रुणांना विविध घटनांमध्ये सेवा पुरवून रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. या तीन वर्षात १४६७ वाहन अपघात झालेत.

हल्ल्याच्या १०३ घटनांमध्ये रुग्णसेवा दिली. जळलेल्यांत १४३ तर कार्डियाक ७५९, पडलेले ६०६, नशा, विषबाधा ११३९, प्रसूती, गर्भधारणा ४८०२, सामूहिक अपघात ६८, वैद्यकीय ६३ हजार २०९, इतर २२ हजार ४८६, पॉलिट्रामा १९४०, आत्महत्या २ अशा ९६ हजार ७४६ रुग्णांचे प्राण वाचवायचे काम १०८ ने केले आहे.विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील ४८९ गर्भवती महिलांची प्रसूती ही १०८ मध्येच झाली आहे. डोंगरदऱ्यात असलेली गाव व अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णालयात पोहचण्याआधीच सुखरूप प्रसूती झाल्या आहेत. दरवर्षी भारतात रस्ते अपघातांचे प्रमाण ३ टक्क्यांनी वाढते. त्यासाठी रस्तासुरक्षेचे नियम पाळणे आवश्यक आहे.

वाहन चालवताना सुरक्षाचिन्हे आणि नियमांचे संकेतांचे पालन करणे, दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. ड्रायव्हिंग करताना मोबाईलचा वापर करू नये. अपघातात बेशुद्ध असलेल्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे द्रव देऊ नये. ही काळजी. मदतीदरम्यान घ्यावी, असे आवाहन १०८ चे जिल्हा व्यवस्थापक विशाल पवार यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular