27.3 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

गणेशोत्सवात ‘कोरे’चा प्रवाशांना दिलासा…

कोकण रेल्वे प्रशासनाने यंदा गणेशोत्सवासाठी केलेल्या विशेष...

चिपळूण पालिकेच्या इमारतीचा वापर थांबवा

पालिकेची मुख्य इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक...

मुंबईतून ‘रो-रो बोट’ साडेसात तासांत रत्नागिरीत…

मुंबई ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग रो-रो बोट सेवेची चाचणी...
HomeKhedखेडमध्ये पूर ओसरला नुकसानीचा आढावा सुरु

खेडमध्ये पूर ओसरला नुकसानीचा आढावा सुरु

अनेकठिकाणी झाडे कोसळल्याने महावितरणच्या तारा तुटल्या आहेत.

खेडमधील पूर शुक्रवारी पहाटे ओसरला आणि रात्रभर टेन्शनमध्ये असलेल्या नागरिकांनी विशेषतः व्यावसायिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. आता या पुरामध्ये किती नुकसान झाले? याचा आढावा घेण्याचे काम शासकीय यंत्रणेने सुरू केले आहे. जगबुडी नदीला आलेल्या पुराचे पाणी गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास खेडच्या मच्छिमार्केटमध्ये घुसले. हे पाणी इतक्या वेगात घुसले की अवघ्या १० ते १५ मिनिटांत मशिद, गांधी चौक, तिनबत्तीनाका परिसर काबिज करत अख्ख्या खेड बाजारपेठेमध्ये या पाण्याने विळखा घातला. पुराची शक्यता असल्यामुळे व्यापाऱ्यांनी त्यांचे साहित्य आधीच सुरक्षितस्थळी हलविले होते.

तरीही पाऊस थांबत नसल्याने पाणी आणि बाजारपेठेत पाणी असल्याने बहुसंख्य व्यावसायिकांनी रात्र जागून काढली. पहाटेच्या सुमारास पूर ओसरला. दरम्यान, गेल्या ३ दिवसांच्या धो-धो पावसामुळे तालुक्यात देखील अनेक ठिकाणी पडझड झाली असून घरे-गोठे, शाळा यांचे नुकसान झाले आहे. अनेकठिकाणी झाडे कोसळल्याने महावितरणच्या तारा तुटल्या आहेत. त्यामुळे काही गावांत वीज सुरू नाही. या सर्व नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करावेत, असे आदेश आ. योगेश कदम यांनी महसूल यंत्रणेला दिले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular