28.1 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

एकापाठोपाठ एक ३ खून झाल्याचे उघड होताच जिल्ह्यात खळबट

मिरजोळेतील भक्ती मयेकर या तरूणीच्या खुनाच्या तपासादरम्यान...

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...
HomeRatnagiriबाधित ग्रामस्थ मोबदल्याच्या प्रतीक्षेत, विमानतळ विस्तारीकरण

बाधित ग्रामस्थ मोबदल्याच्या प्रतीक्षेत, विमानतळ विस्तारीकरण

रत्नागिरी विमानतळ काही वर्षे तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे.

रत्नागिरी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आणि खासगी विमान वाहतुकीच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामाला गती मिळाली आहे. तालुक्यातील तिवंडेवाडीतील सुमारे १८.६८७ एकर खासगी जमीन संपादित केली आहे. त्याचा मोबदला अनेक ग्रामस्थांना अजूनही मिळालेला नाही. त्यामुळे १५ ऑगस्टला ग्रामस्थ उपोषण करण्याच्या तयारीत आहेत. रत्नागिरी विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम वेगात सुरू झाले आहे. यामध्ये रत्नागिरी विमानतळ येथे ‘डॉप्लर व्हेरी फ्रिक्वेंन्सी ओम्री डायरेक्शनल रेडिओ रेंज’ ही यंत्रणा कार्यान्वित केले जाणार आहे. विमानतळासाठी आवश्यक पॅरॉलल टॅक्सी ट्रॅक निर्माण करण्यात येणार आहे.

येणाऱ्या विमानाला तत्काळ धावपट्टी रिकामी करून देण्यास त्याचा फायदा होणार आहे. संस्थापित नेविगेशनला या उपकरणामुळे विमानांशी हवाई संपर्क साधता येणार आहे. रत्नागिरी विमानतळ काही वर्षे तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे. सागरी किनापट्टीच्या सुरक्षेसाठी गोवा ते मुंबई या दरम्यान मध्यवर्ती ठिकाण म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात दलाचा तळ उभारण्यात आला आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा तळ अतिशय महत्वाचा आहे. काही वर्षांपासून त्याचे विस्तारीकरण सुरू आहे. धावपट्टीचे काम पूर्ण झाले असले तरीही अनेक कामे बाकी आहेत. काही अडचणी अजूनही कायम आहेत.

दुसरे विमान आले तर धावपट्टी रिकामी असणे आवश्यक आहे. म्हणून विमान पर्किंगला मोठी जागा लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने तालुक्यातील तिवंडेवाडी येथील १८.६७८ एकर खासगी जमीन संपादित करण्याची अधिसूचना जारी केली आहे. प्रवासी वाहतुकीसाठी विमानतळ रिजनल कनेक्टीव्हिटी स्कीम (आरसीएस) योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे एकंदरच पर्यटन, उद्योग व विमान वाहतूक यांना प्रोत्साहन मिळून रत्नागिरीत विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

या साऱ्या विस्तारीकरणासाठी येथील ग्रामस्थांनी विकासासाठी कमी मोबदला असतानाही आपल्या शेती बागायती असलेल्या जागा दिल्या आहेत. पण अजूनही अनेकांना मोबदला मिळालेला नाही. प्रशासनाकडून मोबदल्याविषयी समर्पक उत्तरे मिळत नाहीत. त्यामुळे मोबदला न मिळालेले ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून ग्रामस्थ निवेदन देण्याच्या तयारीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular