28.5 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeLifestyleदिवाळी पाडवा विशेष

दिवाळी पाडवा विशेष

यंदाच्या वर्षी ४ नोव्हेंबरला दिवाळीला सुरुवात होत आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवसानंतर लक्ष्मी पूजनाच्या पुढच्या दिवशी कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. देशाच्या कृषिप्रधान संस्कृतीचे प्रतिबिंब दर्शविणाऱ्या असा हा दिवाळी पाडव्याचा सण शेतकरी राजा मोठ्या उत्साहात साजरा करतो. इडा- पीडा टळो आणि बळीचे सुवर्णराज्य येवो, अशी विशेष प्रार्थना या दिवशी करण्यात येते.

आज ५ नोव्हेंबर शुक्रवारी बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा. कोरोनाचा कालावधी आणि संसर्ग आत्ता ओसरला असल्याने यंदा दिवाळीचा उत्साह मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. साडे तीन मुहूर्तांपैकी एक म्हणून हा दिवस ओळखला जातो. या दिवशी नवीन काही मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची पद्धत आहे. या दिवशी सोने, वाहन किंवा संपत्तीची खरेदी केली जाते.

बलिप्रतिपदेच्याविषयी एक दंतकथा देखील प्रसिद्ध आहे. शंभू महादेवांना पार्वतीने या दिवशी द्युत खेळामध्ये हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही संबोधले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरेचनाचा सुपुत्र. जरी राक्षसकुळात जन्म घेतला तरी सुद्धा चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून या बळीराजाची ओळख प्रसिद्ध होती‌.

दानशूर म्हणूनही हा राजा खूप प्रसिद्ध होता. पण, पुढे त्याने शक्तीच्या प्रभावाने देवाचाही पराभव केला. बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर विशेष दान देण्याची प्रथा असायची, भगवान विष्णूंनी वामनाचा अवतार धारण करून बटूवेशात बळीराजा समोर उभे ठाकले. या रुपामध्ये वामनाने तीन पावले भूमीची  मागणी केली.

बळीराजाने केलेल्या मागणीनुसार, दान करण्याची तयारी दर्शविली. तेव्हा मात्र वामन अवतारी भगवान श्री विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापुन टाकले. आणि तिसरे पाऊल टाकण्यासाठी त्यांना जागाच शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने स्वतःचे मस्तक पुढे केले.

तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनरुपी भगवान श्री विष्णूनी त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वरदान दिले कि, कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील.

RELATED ARTICLES

Most Popular