राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री उशीरापर्यंत राज्यातील वेगाने वाढणाऱ्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यानंतर कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्यात मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या कडक निर्बंधामध्ये थोडे बदल करण्यात आले असून सुधारित निर्बंध जारी करण्यात आले आहेत.
जाणून घेऊया काय आहेत सुधारित नियम आणि कडक निर्बंध? काय राहणार आहे सुरु आणि बंद !
राज्यात रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत नाईट कर्फ्यू घोषीत करण्यात आला आहे.
राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये दिवसा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत, जेणेकरून गर्दी होणार नाही.
सरकारी कार्यालयात भेटणाऱ्यांना बंदी, आवश्यकता असल्यासच मुख्य कार्यालयाची लेखी परवानगी आवश्यक आहे.
प्रायव्हेट ऑफिसमध्ये वर्क फ्रॉम होम, ५० टक्के पेक्षा अधिक जणांना परवानगी नाही.
लग्न समारंभासाठी ५० जणांना परवानगी आहे.
अंत्यविधी आणि अंत्यसंस्कारासाठी २० जणांना परवानगी देण्यात आली आहे.
सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी ५० जणांना परवानगी देण्यात आली असून, गर्दी न होता सोशल डीस्टन्सिंग पाळणे बंधनकारक आहे.
१५ फेब्रुवारीपर्यंत सर्व शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्यात येणार आहेत.
स्विमिंग पूल, जीम, स्पा, वेलनेस सेंटर, ब्युटी पार्लर मर्यादित क्षमता.
हेअर कटिंगची दुकानं ५० टक्के क्षमतेने सुरू, रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत बंद राहणार
पर्यटन स्थळं बंद, गार्डन, पार्क, प्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम, एन्टरटेन्मेंट पार्क पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.
शॉपिंग मॉल आणि बाजार कॉम्पलेक्स ५० टक्के क्षमतेने सुरू.