28 C
Ratnagiri
Wednesday, June 11, 2025

मुंबईत ट्रेनचा भयावह अपघात, वेगवान लोकलचे प्रवासी धडाधड कोसळले!

मुंबईमध्ये सोमवारी सकाळी ९.३० वा. च्या सुमारास...

भौगोलिक कामांसाठी ३४ कोटींचा खर्च…

कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शेकडो कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या...

महायुतीच्या हिताला बाधा पोहचू देणार नाही – सुनील तटकरे

रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना...
HomeIndiaअखेर दोन वर्षानंतर हापूसची अमेरिका वारी, मिळाली परवानगी

अखेर दोन वर्षानंतर हापूसची अमेरिका वारी, मिळाली परवानगी

दरवर्षी देशातून जवळपास १ हजार टन आंबा हा अमेरिकेत निर्यात होत असतो.

मागील महिन्यात अनेक संकटावर मात करत फळांचा राजा हापुस मुंबई बाजारपेठेत दाखल झाला होता. देशाअंतर्गत बाजारपेठेत तर निर्यातीचा मार्ग खुला झाला होता. कोरोनामुळे परदेशातील खवय्ये गेल्या दोन वर्षापासून हापूस आंब्याच्या चवीपासून वंचित राहिले आहेत. आंबा निर्यातीसाठी अमेरिकेच्या कृषी विभागाची परवानगी गरजेची असते. मात्र, कोरानामुळे निर्यातीला परवानगीच मिळत नसल्याने मागील दोन वर्षापासून इच्छा असून देखील हापूसचा आस्वाद घेता आलेला नाही.

त्यामुळे दोन वर्षाच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर फळांचा राजा हापूस निघाला अमेरिका वारीवर. आता अमेरिकेत निर्याती संबंधीच्या सर्व अडचणी दूर झाल्या असून, अमेरिकेतील ग्राहकांना दोन वर्षानंतर हापूसची चव चाखायला मिळणार आहे. ज्याप्रमाणे देशातील मुख्य बाजारपेठेतील ग्राहक हापूसची आतुरतेने वाट पाहत असतात अशीच स्थिती अमेरिकेतही असते पण कोरोनाच्या प्रतिकूल परस्थितीमुळे निर्यात ही रोखण्यात आली होती. अखेर अमेरिकेतील कृषी विभागाने आयातीस परवानगी दिल्याने निर्यातीचा मार्ग खुला झाला असल्याचे आंबा बागायत संघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मागील दोन वर्ष नैसर्गिक आपत्ती आणि निसर्गाच्या बदलत्या वातावरणातील लहरीपणामुळे आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पण आता बाजारपेठेतील दर आणि निर्यातीला मिळालेली परवानगी यामुळे परकीय चलनाचा आधार शेतकऱ्यांना मिळणार आहे. वाढत्या मागणीमुळे उत्पादनात घट झाली असली तरी उत्पन्न वाढवण्याची संधी शेतकऱ्यांना मिळालेली असल्याने , अखेर केंद्र सरकारने आंब्याच्या विक्रीसाठी हस्तक्षेप केल्याने निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरवर्षी देशातून जवळपास १ हजार टन आंबा हा अमेरिकेत निर्यात होत असतो. यामध्ये ३०० टन प्रमाणात हापूस आंब्याचीच विक्री जास्त असते. मात्र,  गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे निर्माण झालेल्या गंभीर परस्थितीमुळे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार या भागातील आंबा निर्यात ही बंद झाली होती.

RELATED ARTICLES

Most Popular