29 C
Ratnagiri
Monday, June 9, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeDapoliशिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणावरून, दापोलीत राजकारण चांगलेच तापले

शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणावरून, दापोलीत राजकारण चांगलेच तापले

जाणीवपुर्वक कोण राजकारण करून हा कार्यक्रम तीन दिवस आधीच करण्याचे कारस्थान कराल तर याद राखा, आम्हालाही आक्रमक होता येत

दापोली मध्ये आंबेडकर चौकात बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे  अनावरण २९ मार्चला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे,  अशी घोषणा दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी केली होती. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे २९ रोजी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण आणि लोकार्पण करण्यासाठी शहरात येणार आहेत, अशी माहिती आमदार योगेश कदम यांनी माध्यमांना दिली होती. मात्र नगर पंचायतीने २६ रोजी लोकार्पण करण्याची तारीख ठरविल्याने ना. आदित्य ठाकरे दापोलीत येणार नाहीत,  असे नगर पंचायतीने निश्चित केलेल्या तारखे वरून दिसत आहे.

तर पुतळा अनावरण कार्यक्रम हा नगर पंचायतीला डावलून आमदार करत असल्याचा आरोप नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांनी केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीच्या नगरसेवकांनी शिवसेनेतील वरिष्ठ पदाधिकारी यांचेशी संपर्क करून येत्या २६ मार्च रोजी दापोली नगर पंचायत वर्धापन दिनी शिवपुतळ्याचे अनावरण आणि लोकार्पण करण्याची तारीख निश्चित केली आहे. या सोहळ्याला रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार असल्याची माहिती आघाडीच्या वतीने दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांनी दिली.

रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्याशी बोलूनच पुतळ्याच्या लोकार्पणाची २६ मार्च हि तारीख निश्चित करण्यात आलेली. लोकार्पण सोहळ्यासाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना निमंत्रित केले जाणार आहे. तर या तालुक्याचे आमदार व अन्य पदाधिकारी यांना देखील नगर पंचायतीच्यावतीने निमंत्रीत करण्यात येणार आहे,  असे संजय कदम यांनी सांगितले.

त्यामुळे दापोलीचे तरुण आमदार यांनी थेट इशाराच दिला आहे कि, महाराजांचा पुतळ्या बाबत सध्या दापोलीत घाणेरडे राजकारण सुरू आहे हे तात्काळ थांबवण्यात यावे, अन्यथा आम्हाला आक्रमक व्हावे लागेल. दापोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळ्यावरून चुकीच्या पद्धतीने राजकारण कुणीही करू नका, या कार्यक्रमात सन्मानानीय नगराध्यक्षा यांच्यासह नगरपंचायतीला व इतर सगळ्याना सहभागी करून घेतले जाईल. असे असले तरी यावरून जाणीवपुर्वक कोण राजकारण करून हा कार्यक्रम तीन दिवस आधीच करण्याचे कारस्थान कराल तर याद राखा, आम्हालाही आक्रमक होता येत हे दाखवून दयावे लागेल असा इशाराच आमदार योगेश कदम यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular