28 C
Ratnagiri
Friday, June 13, 2025

रत्नदुर्गाच्या बुरूज परिसरात अतिक्रमण…

रत्नागिरीतील प्रसिद्ध रत्नदुर्ग किल्ल्याचा टेहळणी बुरूज पेठकिल्ला...

शिक्षकांना प्रशिक्षणात अपमानास्पद वागणूक – संभाजी थोरात

राज्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणामध्ये प्रथमच...

कृषी विद्यापीठाचा ई-मेल हॅक करून फसवणूक

येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या...
HomeRatnagiriमुंबईहून आलेल्या मुलाचा डोहात बुडून मृत्यू...

मुंबईहून आलेल्या मुलाचा डोहात बुडून मृत्यू…

सोमगंगा नदीवरील डोह येथे आंघोळीसाठी गेला होता.

धामणसे येथील सोमगंगा नदीच्या डोहात बुडून एका सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. देवांश श्रवण मोरे (वय ६, रा. जोगेश्वरी, मुंबई) असे मृत बालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवांश हा त्याच्या नातेवाईकांसोबत मुंबईहून सत्यनारायणाच्या पूजेसाठी आणि पालखीसाठी दिनांक ९ एप्रिल रोजी गावी आला होता. शुक्रवार, दिनांक ११ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास तो त्याच्या चुलत मामा आणि वाडीतील इतर मुलांसोबत धामणसे जोशी वाडी येथील सोमगंगा नदीवरील डोह येथे आंघोळीसाठी गेला होता. पाण्यात बुडाल्याने त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याला तातडीने जाकादेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र, अधिक उपचारांसाठी त्याला रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तपासणी करून सायंकाळी ४.३० वाजता (१६.३० वा.) त्याला मृत घोषित केले.

RELATED ARTICLES

Most Popular