27.5 C
Ratnagiri
Saturday, April 20, 2024

सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा, हल्लेखोरांनी घेतली होती खास ट्रेनिंग

सलमान खान गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपींची मुंबई...

अमित शहांचा मान ठेवत एक पाऊल मागे – उदय सामंत

उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आला तरी...

‘हर घर मशाल’ अभियानाच्या माध्यमातून चिपळुणात महाविकास आघाडीची एकजुट

भक्कम अशी एकजूट दाखवत महाविकास आघाडीने चिपळूणमध्ये...
HomeChiplunचिपळूणात गोवरचे बालक आढळले, आरोग्य यंत्रणा सतर्क

चिपळूणात गोवरचे बालक आढळले, आरोग्य यंत्रणा सतर्क

चिपळूण तालुक्यात मागील महिन्यात गोवरने एक बालक आजारी असल्याचे आढळून आले. ते बालक मुंबईतून चिपळुणात आले होते.

मुंबईमध्ये गोवरच्या साथीचा उद्रेक झालेला असतानाच आता साथ ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्याची चर्चा सुरु आहे. चिपळूण तालुक्यात मागील महिन्यात गोवरने एक बालक आजारी असल्याचे आढळून आले. ते बालक मुंबईतून चिपळुणात आले होते. त्यानंतर जिल्हा परिषद आरोग्य विभाग सतर्क झाला असून बालक राहत असलेल्या ठिकाणापासून एक किमी परिसरात अन्य कोणाला गोवरची लागण झाली आहे का, याचे सर्वेक्षण आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असतानाच राज्य मुंबई, भिवंडी, मालेगाव व अन्य शहरांमध्ये गोवरचा उद्रेक झाल्याने राज्यातील आरोग्य विभागाची डोकेदुखी पुन्हा वाढली आहे. लहान मुलांना संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने यंत्रणा त्वरित हातपाय हलवत आहेत. शासनाने राज्यभरातील आरोग्ययंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.

रत्नागिरी जिल्ह्यातही आरोग्य यंत्रणेकडून गोवरबाबत सतर्कता बाळगण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हाभरातील गोवर संशयित २२ बालकांचे नमुने घेतले होते. त्यापैकी मुंबईतून आलेल्या बालकाला गोवर झाल्याचे स्पष्ट झाले असून, अन्य २१ बालकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तरीही आरोग्य विभाग जिल्ह्यात गोवरबाबत सतर्क आहे. सध्या जिल्ह्यात गोवरचा एकही रुग्ण नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश बालकांना नवव्या महिन्यातच गोवरचे लसीकरण करण्यात येते. वेळीच लसीकरण करण्यात येत असल्याने गोवरची लागण होत नाही. जिल्ह्यातील ८ हजार ९५३ बालकांना गोवरची लस दिलेली आहे; मात्र गोवरने आजारी असलेले हे बालक मुंबईतून आले आहे. तरीही आरोग्य विभागाकडून सतर्कता बाळगण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular