26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriड्रेझिंगमुळेच जयगड किल्ल्याच्या बुरुजांना तडे

ड्रेझिंगमुळेच जयगड किल्ल्याच्या बुरुजांना तडे

किल्ल्याच्या २०० म ीटर अंतरावर यंत्राच्या सहाय्याने काम गेले ६ महिने सुरू आहे.

जयगड येथील जेएसडब्ल्यूच्या नवीन जेटीसाठी पुरातन जयगड किल्ल्याच्या बुरुजाशेजारी ड्रेझींग आणि ड्रिलींगचे काम जोरात सुरू आहे. याच्या तीव्रतेने बुरूजांना धक्के बसत असल्याने किल्ल्याला धोका निर्माण झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या तक्रारीनंतर तहसिलदारांनी याठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यांनीही ड्रेझिंगचे काम सुरू झाल्यापासूनच बुरुजाला तडे गेल्याचे मान्य केले आहे. पुरातत्व विभागाने यासंदर्भात आता जेएसडब्ल्यूला नोटीस देणार असल्याचे म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या तक्रारीनुसार, याठिकाणी पाहणीसाठी गेलेल्या तहसिलदारांनी दिवसभर याठिकाणी सुरू असलेल्या कामाची तसेच किल्ल्याचीही पाहणी केली.

यानंतर त्यांनी याठिकाणी पंचनामाही केला. हा पंचनामा जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. पंचनाम्यात म्हटल्याप्रमाणे किल्ल्याच्या २०० म ीटर अंतरावर यंत्राच्या सहाय्याने ड्रेझिंग आणि ड्रिलींगचे काम गेले ६ महिने सुरू आहे. हे काम सुरू झाल्यापासूनच बुरुजाला तडे गेले आहेत. किल्ल्याची देखभाल करणारे कर्मचारी आणि पाहणीसाठी गेलेले अधिकारी आणि ग्रामस्थांच्या समक्ष ही पंचयादी तयार करण्यात आली आहे. किल्ल्याच्या पूर्व बाजूस खाडीकडे अनधिकृत उत्खनन करून भराव टाकून बांधकाम केल्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलून भरतीच्या लाटा तटबंदीवर आदळत आहेत.

यामुळे बुरूज ढासळत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तहसिलदारांनीही आपल्या पंचयादीत हीच वस्तुस्थिती असल्याचे नमूद केले आहे. हे काम सुरू राहिल्यास किल्ल्याचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते, असे सांगत कंपनीने ड्रेझिंगचे काम तत्काळ बंद करावे, असे तहसिलदारांनी नमूद केले आहे. शासनाच्या पुरातत्व विभागाने लक्ष घालून बुरूजाची दुरुस्ती होईपर्यंत काम बंद ठेवावे, असेही यात म्हटले आहे. दरम्यान, आता जिल्हाधिकारी आणि पुरातत्व विभाग कोणती कारवाई करणार याकडे ग्रामस्थांचे तसेच दुर्गप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. पुरातत्व विभागाचे अधिकारी राज दिवेकर यांनी आपण जेएसडब्ल्यूला नोटीस बजावणार असल्याचे सांगितले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular