26.5 C
Ratnagiri
Friday, December 19, 2025

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष गाडया

ख्रिसमसची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या...

बेकायदेशीर वाळू उपसा होताना दिसल्यास कारवाई होणार – जिल्हाधिकारी आक्रमक

बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत आलेल्या तक्रारीवरून आम्ही संगमेश्वरमध्ये...

रत्नागिरी शहरात भरवस्तीत बिबट्याच्या संचाराने घबराट

रत्नागिरी शहराच्या अगदी मध्यवर्ती आणि रहिवासी भाग...
HomeRatnagiriविकासकामाची टक्केवारी नको, आशीर्वाद द्या - पालकमंत्री उदय सामंत

विकासकामाची टक्केवारी नको, आशीर्वाद द्या – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरीच्या विकासाची जबाबदारी ज्या पद्धतीने मी घेतली त्याप्रमाणे तुमच्या विकासाची जबाबदारी माझी आहे.

विकासकाम केल्यानंतर टक्केवारी घेणारा भी मंत्री नाही, तर मला फक्त आशीर्वाद द्या, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी दांडेआडोम येथे सांगितले. सध्या निवडणुका जवळ आल्या आहेत. मतदारसंघात काळी मांजरे फिरू लागली आहेत, असे सांगतानाच पाच वर्षे कुठे होता, असा जाब त्यांना विचारा, असे मंत्री सामंत यांनी आवाहन केले. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील दांडेआडम येथील विकासकामांसाठी पालकमंत्री सामंत यांनी १ कोटींचा निधी दिला होता. त्यांचे भूमिपूजन झाले. या प्रसंगी ते म्हणाले, ‘रत्नागिरीच्या विकासाची जबाबदारी ज्या पद्धतीने मी घेतली त्याप्रमाणे तुमच्या विकासाची जबाबदारी माझी आहे.

मागील २५ वर्षांची परंपरा कायम राखल्याचे दांडेआडोमवासीयांनी आजच्या उपस्थितीने दाखवून दिले आहे. तुमचे प्रेम आजची गदीं सांगून गेली. सर्वसामान्यांच्या सरकारबरोबर काम करतोय, त्याचा मला आनंद आहे. मी दर आठवड्याला शनिवार व रविवारी तुमच्या सेवेसाठी मतदारसंघात असतो आणि जनतेची सेवा करतो. जी लोकं आपल्यासाठी काम करतात त्यांच्यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला तालुकाप्रमुख बाबू म्हाप, सरपंच कैलास तांबे, उपसरपंच रिया तुळसणकर, गावकर आनंद तांबे, नारायण सनगरे, अरुण झोरे, रामचंद्र मांडवकर, सुनील मांडवकर, प्रीती कारकर, ज्योती पोमेंडकर, दीपाली तांबे, देवदत्त पेंडसे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular