30.4 C
Ratnagiri
Friday, March 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeRatnagiri५ जूनला पर्यावरणदिनी उपक्रम : संकलित प्लास्टिकचे पुन्हा वापर

५ जूनला पर्यावरणदिनी उपक्रम : संकलित प्लास्टिकचे पुन्हा वापर

भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत ५ जूनला पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टिकमुक्तीसाठी महाश्रमदान मोहीम राबविण्यात येणार आहे. या दिवशी गोळा केलेल्या प्लास्टिकचे पुनर्चक्रीकरण केले जाणार असून, त्यासाठी चिपळूण व रत्नागिरीतील दोन कंपन्यांची नियुक्ती केली आहे. ही मोहीम जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाकडून राबवली जाणार आहे.श्रमदान मोहिमेसाठी यंत्रणा ग्रामपंचायतस्तरावर नियोजन करावयाचे आहे. त्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी संपर्क अधिकाऱ्यांच्या साह्याने ग्रामपंचायतनिहाय २२ ते २५ मे या कालावधीत गावातील कचरा साठणारी ठिकाणे निश्चित करून जिल्हा परिषदेच्या ॲपवर जीओ टॅग करावयाची आहेत. तेथे पुनःश्च कचरा जमा होणार नाही, याचीही दक्षता त्यांनीच घ्यावयाची आहे.

२६ ते ३१ मेपर्यंत कार्यक्रमाची माहिती ग्रामपंचायतींना द्यावयाची आहे. व्यापारी, दुकानदारांच्या बैठका घेऊन प्लास्टिक बंदचे आवाहन केले जाईल. आशा व अंगणवाडी सेविका, सामान्य नागरिक, शासकीय अधिकारी व कर्मचारी, शालेय विद्यार्थी, नेहरु युवा केंद्र, NCC, NSS चे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संघटना, उद्योजक, शैक्षणिक संस्था, पोलिस दल, दवाखाने, शेतकरी संघटना आणि ग्रामपंचायतीमार्फत गावागावांत जागृती केली जाईल. ५ जून या दिवशी प्रत्येक ग्रामपंचायतीमधून किमान १२ किलो प्लास्टिक गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मोहीम राबवल्यानंतर प्लास्टिक कचऱ्याच्या गोणी ग्रामपंचायतीचे नाव व बॅग नंबर लिहून तालुकास्तरावरील संकलन केंद्रावर पाठवायच्या आहेत. ही माहिती अॅपवर नोंदवली जाईल.

६ ते १० जून या कालावधीत मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर या तालुक्यातील ग्रामपंचायतींनी एकत्रित केलेला प्लास्टिक कचरा प्रक्रियेसाठी वाहून आणला जाईल. या तालुक्यांसाठी चिपळूण खडपोली येथील अमर इंडस्ट्रीजची निवड केला आहे. मयुर महाडिक यांच्याशी संपर्क करून त्या कंपनीत कचरा प्रक्रियेसाठी दिला जाईल. राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर या चार तालुक्यांसाठी रत्नागिरीतील झाडगाव येथील एम. एस. मलुष्टे कंपनीचे मल्हार मलुष्टे यांची नियुक्ती केली आहे. संकलन आणि कचरा कंपनीपर्यंत नेण्याचे नियोजन पंचायत समितीस्तरावरुन गटविकास अधिकारी यांनी करावयाचे आहे. प्लास्टिकच्या प्रकारानुसार ग्रामपंचायतीला कंपनीकडून किलोनिहाय रक्कम दिली जाणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular