27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...
HomeLifestyleनैराश्यामध्ये औषधापेक्षा व्यायाम चांगला

नैराश्यामध्ये औषधापेक्षा व्यायाम चांगला

मानसिक आरोग्य संकटाने ग्रस्त असलेले लोकानी दररोज ३० मिनिटे व्यायाम केल्याने, या लोकांमध्ये नैराश्य कमी होते.

मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंजत असलेल्या लोकांमध्ये, व्यायामामुळे निराशेची भावना कमी होते. सायकियाट्रिक रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात, मानसिक आरोग्य संकटाने ग्रस्त असलेले लोकानी दररोज ३० मिनिटे व्यायाम केल्याने, या लोकांमध्ये नैराश्य कमी होते. शिवाय आत्महत्येचा विचारही येत नाहीत.

संशोधकांच्या टीमने १८ ते ६५ वयोगटातील महिलांचा अभ्यास केला. नुकताच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्यातील निराशेची आणि आशेची भावना जाणून घेण्यासाठी त्यांना काही प्रश्न विचारले गेले. त्यांना दररोज सुरू असलेल्या थेरपीसह दोन दिवसांचा व्यायाम किंवा बैठी नोकरी यापैकी एक निवडण्यास सांगण्यात आले. यानंतर काही महिलांनी दोन दिवस ३०-३० मिनिटे त्यांच्या आवडीचा व्यायाम केला तर काहींनी त्यांच्या खोलीत एकटे राहून पुस्तके वाचली आणि खेळ खेळले.

अभ्यासात सहभागी असलेल्या प्रत्येकाला एक फॉर्म भरून त्यांच्या अनुभवाबद्दल विचारण्यात आले. दोन दिवस व्यायाम करणाऱ्या महिलांमध्ये नैराश्य कमी झाल्याचे दिसून आले, तर खोलीत एकट्या असलेल्या महिलांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तसेच, सहभागींना कार्यक्रम समाधानकारक वाटला आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत. हा कार्यक्रम राबवणेही सोपे होते.

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे रुग्ण त्यांच्या दैनंदिन व्यायामाच्या वेळेबद्दल खूप उत्साही होते. नैराश्यावरील औषधांपेक्षाही चांगला परिणाम झाला. महिलांना बाहेरच्या व्यायामाचा जास्त परिणाम होतो. अभ्यासानुसार, व्यायामामुळे महिलांमध्ये आत्मनिर्भरतेची भावनाही वाढली. महिलांना इनडोअर बुक वाचन आणि मैदानी व्यायामाचे काम देण्यात आले. महिलांना बाहेरच्या व्यायामाने बरे वाटले. त्यामुळे आपले मान गुंतवून ठेवण्यासाठी आपणच प्रयत्न करणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular