24 C
Ratnagiri
Sunday, November 9, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriसिलेंडरच्या स्फोटात संगमेश्वरातील कुटुंबावर मोठा घाला

सिलेंडरच्या स्फोटात संगमेश्वरातील कुटुंबावर मोठा घाला

भोजने यांच्या घरात गॅस पाईपलाईनची जोडणी अर्धवट अवस्थेत होती.

कोल्हापूर येथे ही दुर्घटना घडली आहे. गणेशोत्सवासाठी कोल्हापूरहून आपल्या मूळ गावी म्हणजेच संगमेश्वर तालुक्यातील शिवणे गावी भोजने कुटुंब येण्याची तयारी करत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.

एका निर्णयाने सारं बदललं – अमर भोजने हे गेली चार वर्षे कुटुंबासह कोल्हापुरात वास्तव्यास होते. ते एलआयसी कॉलनीजवळील एका भागात राहत होते आणि हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करत होते. गणेशोत्सवासाठी कुटुंबाने मूळ गावी जाण्याचा बेत आखला होता. मात्र, अमर यांची रात्रपाळीची ड्युटी असल्याने ‘एक रात्र थांबून सकाळी निघू’ असा निर्णय घेतला गेला. याच निर्णयाने त्यांचं आयुष्य बदलून टाकलं.

अचानक स्फोट झाला – भोजने यांच्या घरात गॅस पाईपलाईनची जोडणी अर्धवट अवस्थेत होती. घराबाहेर खिडकीजवळ गॅस मीटर बसवण्यात आला होता. मात्र, गॅस सुरू झाला होता, याची कल्पना कुटुंबाला नव्हती. रात्री शीतल यांनी जेवण गरम करण्याचा प्रयत्न करताच अचानक स्फोट झाला आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. या दुर्घटनेत शीतल अमर भोजने यांचा मृत्यू ओढवला असून त्यांचे सासरे आणि दोन चिमुरडी मुले जखमी झाली आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गावकरी कोल्हापूरला – घटनेची माहिती मिळताच शिवणे गवळवाडी गावातील ग्रामस्थांनी कोल्हापुरात धाव घेतली. सरपंच राजू पवार यांनी त्यांच्या नातेवाइकांकडे कुटुंबाची विचारपूस केली आणि ग्रामपंचायतीमार्फत सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. ही घटना अवघ्या गावासाठीच नव्हे तर कोकणात गणेशोत्सवाच्या सणात रंगलेल्या प्रत्येकासाठी धक्का देणारी आहे. दोन चिमुकल्या जीवांनी आई गमावली, तर एका पित्याने पत्नी आणि वृद्ध वडिलांच्या जीवनासाठी धडपड सुरू ठेवली आहे. या कुटुंबाला सावरण्यासाठी शासन, समाज आणि नागरिकांनी एकत्र येणे काळाची गरज आहे.

RELATED ARTICLES

Most Popular