27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeChiplunपुराचे संकट संपेस्तोवर नागरिकांच्या पाठीशी शासन - ना. सामंत

पुराचे संकट संपेस्तोवर नागरिकांच्या पाठीशी शासन – ना. सामंत

पुराचे संकट जोवर चिपळूणवासियांच्या आयुष्यातून संपत नाही तोवर आपली काळजी घेण्यासाठी शासन आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी येथे दिली. शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्व एकत्रित येऊन काम करीत आहोत. चांगल्या कामांना समर्थन, अशी आपली सर्वांची भूमिका आहे, याबद्दल मनस्वी समाधान वाटते असेही ते म्हणाले. चिपळूण येथील स्व. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र नूतनीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार रमेशराव कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, सचिन कदम, भाजप शहराध्यक्ष आशिष खातू, माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, माजी नगरसेवक उमेश सकपाळ, शशिकांत मोदी, विजय चितळे, परिमल भोसले, माजी नगरसेविका सुषमा कासेकर,माजी नगराध्यक्षा रिहाना बिजले, प्रांताधिकारी प्रवीण पवार आदि म ान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री ना. सामंत म्हणाले,

गेल्या दोन वर्षापूर्वी चिपळूण शहरात पूर आला होता. परत पूर येऊ नये, यासाठी युध्दपातळीवर काम सुरु आहे. पूराचे संकट जोपर्यंत चिपळूणकरांच्या आयुष्यातून जात नाही तोपर्यंत शासन आपली काळजी घेण्यासाठी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.चिपळूणमधील रेड लाईन, ब्लू लाईन हा महत्वाचा विषय आहे. चिपळूणकरांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. विकासाची कामे करीत असताना सर्वांनी एकत्रित येऊन काम केले पाहिजे. विकास करताना राजकीय मतभेद बाजूला ठेवून पक्षविरहीत काम व्हायला हवे, असे पालकमंत्री सामंत म्हणाले.

स्व. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरणासाठी दिलेल्या निधीचा योग्य विनियोग झाला पाहिजे. तसेच चिपळूण शहराच्या इन्फ्रास्टक्चर डेव्हलमेंट साठी पुढच्या जिल्हा वार्षिक नियोजनामध्ये ५ कोटी रुपयांचा निधी चिपळूण नगरपालिकेला दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री या नात्याने ना. सामंत यांनी दिली. या निधीमधून चिपळूण शहाराचा कायापालट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी क्रीडा संकुल, सिंथेटिक कोर्ट बनविणे, श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळयाभोवतीचे सुशोभीकरण, चिपळूण नगरपालिका हद्दीतील जि.प.प्रा.शाळा गोवळकोट भोईवाडी नवीन इमारत बांधणे, या विकासकामांचे भूमीपूजन पालकमंत्री महोदयांच्या हस्ते संपन्न झाले.

हे नाटयगृह दि. १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत सुरु होईल, अशी माहिती यावेळी चिपळूण मुख्याधिकारी श्री. प्रसाद शिंगटे यांनी दिली. तसेच लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर चिपळूण येथे राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गाळ काढणे कामाचा आढावा घेतला व चर्चा केली. यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, प्रांत अधिकारी प्रवीण पवार, अरुण भोजने, किशोर रेडीज, समीर जानवलकर, निहार कोवळे, माजी नगरसेविका स्वाती दांडेकर, श्रीराम रेडीज, उमेश काटकर, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष निर्मला जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular