27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiri…तर टक्कल करून फिरेन ! मनसेच्या जाधवांचं विनायक राऊतना चॅलेंज

…तर टक्कल करून फिरेन ! मनसेच्या जाधवांचं विनायक राऊतना चॅलेंज

ना. नारायण राणे यांच्या प्रचारासाठी आता मनसे देखील कोकणात उतरली आहे.

महायुतीच्या प्रचारात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे नेतेमंडळी देखील सहभागी होत आहेत. मनसे नेत्यांकडून आता विरोधकांवर निशाणा साधला जातोय. मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यावर अतिशय खोचक शब्दांत टीका केली आहे. विनायक राऊत अडीच लाखांनी जिंकून आले तर आपण टक्कल करुन फिरू, अशी देखील मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

खासदार विनायक राऊत हे गेल्या १० वर्षांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. यावेळी त्यांना भाजपचे उमेदवार ना. नारायण राणे यांचं कडवं आव्हान आहे. ना. नारायण राणे यांच्या प्रचारासाठी आता मनसे देखील कोकणात उतरली आहे. भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी मनसेदेखील मैदानात उतरली आहे. मनसेकडूनही रत्नागिरीत सभा आयोजित करण्यात आली होती.

अविनाश जाधव नेमकं काय म्हणाले? –  ना. नारायण राणे यांना बहुमताने निवडून आणायचं हा एक विचार आमच्या मनात आहेच, पण त्यासोबत शिवसेनेचे जे काही नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत भुंकतात ना, त्यांना पाडण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत, अशी टीका अविनाश जाधव यांनी केली. यावेळी अविनाश जाधव यांना खासदार विनायक राऊत यांच्या विजयाच्या दाव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. आपला अडीच लाख विजयांनी विजय होणार, असा दावा विनायक राऊतांनी केलाय. त्यावर अविनाश जाधव यांनी टीका केली आहे. रात्री १०.३० वाजेनंतर भिंत चाचपडत जाणारा माणूस अडीच लाख मतांनी कसा निवडून येणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवावर निवडून येणारी ही लोकं. या विनायक राऊतांना ते राहतात तिथे त्यांना कोण विचारत नाहीत. ते कुठे अडीच लाख मतांनी निवडून येणार? विनायक राऊत अडीच लाख मतांनी निवडून आले तर मी टक्कल करुन फिरेन, अशी टीका अविनाथ जाधव यांनी केली.

संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले? – मनसे नेते संदीप देशपांडे यांनीदेखील खा. विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला तेव्हा बऱ्याच लोकांची पायाखालची जमीन सरकली. त्यामुळे अनेक लोकं भुंकायला लागलेली आहेत. या भुंकणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवून द्यायचीच आहेत. ते आम्ही दाखवून देणार, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.

RELATED ARTICLES

Most Popular