26.7 C
Ratnagiri
Saturday, July 19, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeKokanशेकाप नेत्याच्या दोन मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू

शेकाप नेत्याच्या दोन मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू

तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून कुटुंबियांकडे सोपवण्यात आलेत.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे समर्थक असणाऱ्या संतोष पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्यांच्या दोन्ही मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय. उन्हाळी सुट्टीला गावी आलेल्या भाच्यासह संतोष पाटील यांची दोन्ही मुलं श्रीवर्धन तालुक्यातील वेळास बीचवर फिरायला गेले होते. तेव्हा खोल पाण्यात लाटांसोबत ते समुद्रात ओढले गेले आणि बुडाले. याबाबत मिळालेली माहिती अशी की, संतोष पाटील यांच्या बहिणीचा मुलगा ऐरोली इथून गावी आला होता. त्याच्यासोबत संतोष पाटील यांची दोन्ही मुलं वेळास बीचवर गेले. बीचवर तिघेही पोहायला समुद्रात उतरले असताना मोठ्या लाटांसोबत ते समुद्रात ओढले गेले. तिन्ही मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्यानं संतोष पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

संतोष पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी नवी गाडीही घेतली होती. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होतं. पण आता तीन मुलांच्या अशा मृत्यूने पाटील कुटुंब दुःखाच्या सागरात बुडालंय. पाटील यांचे म्हसळा तालुक्यातल्या गोंडघर इथं घर संतोष पाटील यांची मयुरेश आणि अवधुत ही दोन मुलं भाचा हिमांशूसोबत वेळास बीचला गेले होते. हिमांशू मुंबईत राहत असून सुट्टीनिमित्त तो गावी आला होता. तिघांचेही वय २१ ते २६ वर्षे इतकं आहे. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून कुटुंबियांकडे सोपवण्यात आलेत.

RELATED ARTICLES

Most Popular