27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiriरत्नागिरी कधी होणार अनलॉक !

रत्नागिरी कधी होणार अनलॉक !

महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचा प्रभाव कमी होत असताना दिसत आहे. हळूहळू राज्यामध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरु होताना दिसत आहे. सोमवार ७ जून पासून राज्यामध्ये अनलॉकच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार असली तरी, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार, कोरोना संसर्ग वाढविणारे कोणतेही कार्यक्रम नको, आरोग्याच्या नियमांचे पालन हे काटेकोरपणेच केले गेले पाहिजे, दैनंदिन व्यवहार किती वेळ आणि त्याचे नियोजन कसे असेल, याचा स्थानिक जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यायचा आहे, ती संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या साडे चार हजार संक्रमित रुग्ण असून, पावणे सहाशे रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. रत्नागिरीमध्ये ६७% पेक्षा जास्त ऑक्सिजन बेड्सवर असून पॉझिटीव्हिटी दर १० ते २० टक्क्यांपर्यंत आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्गसह काही जिल्हयांचे निकषानुसार अनलॉकच्या चौथ्या टप्प्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रविवारी संध्याकाळपर्यंत शासन काही निर्णय घेते का! याकडे रत्नागिरीकरांचे लक्ष लागुन होते. परंतु, अनलॉकच्या घोषणे ऐवजी रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी संचारबंदी ९ जून रात्री १२ वाजेपर्यंत राहील, जेंव्हा आवश्यक असेल, तेंव्हाच मार्गदर्शक सूचनांवरून मी आदेश काढेन आणि तेच वैध असतील. त्यामुळे तूर्तास तरी ९ जून रात्री पर्यंत असलेल्या कडक संचारबंदीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, रत्नागिरीतील नागरिकांनी अनलॉक प्रक्रीये संदर्भात मनात कोणताही गोंधळ निर्माण करून घेऊ नये.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रविवार ६ जुन रोजी संध्याकाळी अनलॉक प्रक्रियेबद्दल आदेश काढण्यात आलेत. परंतु, रत्नागिरी मध्ये मात्र असे कोणतेही आदेश आले नाहीत. त्यामुळे सर्व सामन्य जनतेला हा प्रश्न सतावत आहे कि, मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली असून, मग अनलॉकचे निर्बंध फक्त रत्नागिरी साठीच लागू आहेत का?

RELATED ARTICLES

Most Popular