25.9 C
Ratnagiri
Friday, March 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeRatnagiriकडवई चिखली रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

कडवई चिखली रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

१९ मे पासून रिक्षा मालक चालक संघटना कडवई तुरळ चिखली यांच्यावतीने बांधकाम विभागाच्या देवरुख कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.  

संगमेश्वर तालुक्यातील कडवई चिखली रस्त्याच्या दुरुस्ती कामाकडे बांधकाम विभागाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी गुरुवार दिनांक १९ मे पासून रिक्षा मालक चालक संघटना कडवई तुरळ चिखली यांच्यावतीने बांधकाम विभागाच्या देवरुख कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

कडवई चिखली रस्त्याची दुरावस्था झाली असून गेली तीन वर्षे या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीवर प्रतिवर्षी लाखोंची उधळण केली जाते. मात्र प्रत्यक्षात काम केले जात नसून फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी केला आहे.

या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रिक्षा संघटनेच्या वतीने गेली दोन वर्षे पाठपुरावा केला जात आहे. मात्र झोपेच सोंग घेणाऱ्या बांधकाम विभागाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. अखेर रिक्षा संघटनेच्या वतीने ९ मे रोजीच्या पत्राद्वारे दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ न झाल्यास १९ मे रोजी  ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र १९ मे पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने अखेर रिक्षा संघटनेच्या वतीने गुरुवारी सकाळी पासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

१९ मे रोजी जिल्हापरिषद सदस्य संतोष थेराडे यांनी मध्यस्थी केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनी सदर रस्त्यावर वार्षिक देखभाल व दुरुस्ती कार्यक्रम अंतर्गत ३१ लाखाचे काम मंजूर असून सध्या निविदा स्तरावर असल्याचे पत्र आंदोलनाच्या दिवशी दुपारी १२ वाजता संघटनेला व्हाट्सएपवरून पाठविल्याचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी सांगितले. मात्र हे पत्र समाधानकारक नसल्याने आपण ठिय्या आंदोलनास बसल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले. जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी सांगितले. रिक्षा संघटनेच्या या आंदोलना नंतर सार्वजनिक बांधकाम विभाग कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular